Thursday , April 16 2026
Breaking News

चंदगड

मुलगा होत नाही म्हणून पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

कोल्हापूर : तीन मुलीनंतर मुलगा होत नसल्याने आई-वडिलांच्या चिथावणीवरून अंगावर रॉकेल ओतून पेटवून पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर (वर्ग 1) श्रीमती एस आर पाटील यांनी पतीला जन्मठेप व सासू सासर्‍याला दोन महिने कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. पती अल्ताफ बुडेलाल उर्फ दादेसाब चमनशेख, सासरा बुढेलाल जीनसाब …

Read More »

महाराष्ट्रात दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरू, कोल्हापूर जिल्ह्यात ८५० केंद्र

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक क उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा आज मंगळवार दि. १५ पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत तीन जिल्ह्यातील दहावीचे १ लाख ३४ हजार १३१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ आहेत. आज सर्वच केंद्रावर विद्यार्थ्यानी मराठी विषयाचा पेपर दिला. शाळा …

Read More »

कोविड-19 मुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधीची तरतूद

कोल्हापूर (जिमाका) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीचा विनयोग कोविड-19 मुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे. कोविड -19 संसर्गामुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शालेय …

Read More »

चंदगड तालुक्यातील करंज गावचा जवान नितेश मुळीक आसाममध्ये शहिद

चंदगड तालुका हळहळला तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील करंजगावचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) हा आसाममध्ये सेवा बजावत असताना शहिद झाला. बुधवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचे कळते. ही दुःखद बातमी समजताच चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली. नितेश आठ वर्षापासून मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता

कोल्हापूर (जिमाका): वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात …

Read More »

अवैद्य दारू निर्मिती अड्ड्यावर छापा; तब्बल ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेकायदेशी देशी, विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मद्यसाठा आणि इतर साहित्य असे एकूण ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर शहरापासून जवळच असणाऱ्या गोकुळशिरगाव येथील एका शेडमध्ये ही अवैद्य दारू भट्टी सुरू होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ …

Read More »

तेऊरवाडीच्या स्वाती पाटील हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड (ता. चंदगड) येथील बी.ए भाग दोनची स्वाती लक्ष्मण पाटील हिची ठाणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. ही निवड 17 फेब्रुवारी 2022 रोजी सांगाव कागल येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्य पद स्पर्धेतून झाली आहे. …

Read More »

विशाळगड विषयाच्या संदर्भात लक्ष घालू आणि जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊ! :  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

  कोल्हापूर : विशाळगड येथील विषयाशी मी अवगत आहे. यासंदर्भात आपण लक्ष घालू आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन असे आश्वासन, पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिले. विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने मंत्री …

Read More »

मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत आतापासून सोडणार : मानसिंग खोराटे

  हलकर्णी (एस. के. पाटील) : तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत साखर कारखाना आजपासूनच सोडणार असे अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेडचे मानसिंग खोराटे यांनी कारखाना स्थळावर सांगितले. दौलत साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आज सकाळपासून थकीत पगार आणि ग्रॅच्युटी मिळावी यासाठी गेटवर आंदोलनाला बसले आहेत. यामुळे जवळपास २-३ …

Read More »

काम करणाऱ्यांना कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल : आमदार राजेश पाटील

१ कोटी १० लाखांच्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजकारण हे क्षणापुरते तर समाजकारण सदैव असायला हवे. आमदार हा एखाद्या गटाचा, गावचा नसून तो संपूर्ण आम जनतेचा आहे. निवडणूकीपूरत्या भूलथापा देणाऱ्यांची पाठराखण न करता काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल, असे विचार …

Read More »