Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

राज्यातील निवडणुकीनंतर सरकार झाले सक्रीय

  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा बंगळूर : कर्नाटकातील सर्व मतदारसंघांसाठी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आचारसंहिता लागू असल्याने त्याचा प्रशासकीय यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिली. विधानसौधच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या …

Read More »

पुढील वर्षापासून दहावी परीक्षेतील ग्रेस मार्क्स रद्द

  बंगळूर : पुढील वर्षापासून दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेत ग्रेस मार्क देण्याची पध्दत रद्द करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विधानसौध येथे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांना २० ग्रेस गुण दिले आहेत. कोणत्या कारणासाठी आणि हेतूने …

Read More »

कर्नाटकात अभूतपूर्व भ्रष्टाचार; भाजपची टीका

  राज्यात कायदा, सुव्यवस्था ढसळल्याचा आरोप बंगळूर : कर्नाटकमध्ये अभूतपूर्व पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपने केला असून, विभागातील प्रत्येक पदासाठी रक्कम निश्चित केली आहे. पक्ष कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉ.सी.एन. अश्वत्थनारायण, विधान परिषद सदस्य चलवादी नारायण स्वामी, माजी आमदार पी. राजीव यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. …

Read More »

महिलेचं डोकं अडकलं चक्क बसच्या खिडकीत!

  बंगळुरू : बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे डोके खिडकीत अडकून बसल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार आज बंगळुरूमध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बंगळूरमध्ये राज्य परिवहनच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेने बसच्या लहान खिडकीतून खिडकीबाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या खिडकीतून बाहेर डोकावताना महिलेचं डोकं खिडकीत …

Read More »

ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवराज साळोखे यांची निवड

  निपाणी(वार्ता) : ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवराज बाजीराव साळोखे यांची निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र त्यांना निपाणी येथे देण्यात आले. यावेळी युवराज साळोखे यांनी ४ ह्युमन राईट्स संघटनेच्या माध्यमातून सर्व स्तरावरील सामाजिक कार्य निस्वार्थीपणे संघटनेच्या सर्वांना विश्वासात घेवून केले जाईल असे सांगितले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय …

Read More »

टीसीसह पाच जणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

  खानापूर : तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीवर प्रवाशाने प्राणघातक हल्ला केला असता टीसीला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर बेळगाव येथे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चालुक्य एक्सप्रेस (पॉंडेचेरी-दादर) रेल्वेमध्ये टीसी प्रवाश्यांचे तिकीट …

Read More »

नुकसानग्रस्तांना भरपाई देणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब …

Read More »

अशोक नगरातील गटारीचे बांधकाम चुकीचे : माजी सभापती विश्वास पाटील यांचा आरोप

  निपाणी (वार्ता) : अशोकनगर ते पांडु मेस्त्री यांच्या दुचाकी गॅरेज पर्यंत यापूर्वी चुकीच्या पद्धतीने गटारीचे बांधकाम झाले होते. त्यामुळे बरीच वर्षे या परिसरातील नागरिकांंना पावसाळ्यात बराच त्रास सहन करावा लागला. आता याच भागात नगरपालिकेतर्फे जुनी गटार काढून नवीन गटार बांधली जात आहे. पण सध्या पूर्वीप्रमाणे गटारीचे बांधकाम सुरू आहे. …

Read More »

बंगळुरूत ‘यलो अलर्ट’; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

  बंगळुरू : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. उत्तर भारतात मे महिन्याच्या कडाकाच्या उन्हानं काहिली होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, …

Read More »

मणतुर्गे येथील ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा पायाभरणीचा समारंभ

  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी बुधवार दिनांक १५ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्लिंथ (बीम) भरणी समारंभ गावचे वतनदार श्री. राजाराम दत्तू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मंदिराचे पुजारी श्री. जोतिबा दत्तू गुरव यांच्या हस्ते श्री रवळनाथाचे पुजन करण्यात आले. तसेच …

Read More »