Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर नगरपंचायतीची सूत्रे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी स्वीकारली

  खानापूर : खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वटारी यांना मोकळीक देऊन सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने त्यांच्या जागी संतोष कुरबेटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी खानापूर येथे उपस्थित राहून आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अभियंता तिरुपती लमानी, राजु जांबोटी, गंगाधर कांबळे, प्रेमानंद नाईक, शोभा …

Read More »

दहावी, बारावीच्या यापुढे दरवर्षी तीन परीक्षा : मधु बंगारप्पा

  बंगळूर : राज्यातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) विद्यार्थ्यांसाठी वर्षातून तीन वेळा परीक्षा लिहिण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी केली. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विधानसौध येथील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित …

Read More »

डेंगी सदृश आजाराने निपाणीत युवकाचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : डेंगी सदृश आजाराने निपाणीतील प्रगती नगरमधील युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.५) सायंकाळी घडली सौरभ राजू माने (वय २६) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ माने हा येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता. आठ दिवसापूर्वी त्याला किरकोळ ताप येऊन रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे …

Read More »

डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन निपाणी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केल्याने शिक्षकांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे. शिक्षकांमध्ये देशाचे भविष्य निर्माण करण्याची ताकद आहे, असे मत आमदार शशिकला …

Read More »

दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज; निपाणीत लाखाचे बक्षीस

  श्रीकृष्ण जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : श्रीकृष्ण जयंती उत्सव एक दिवसांवर आणि गोपाळकाला दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गोपाळकाला सणासह मंडळ व गोविंदा पथके दहीहंडीसाठी सज्ज झाली आहेत. दहीहंडी उत्सवाची अधिक रंगत आणण्यासाठी निपाणी व परिसरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. जन्माष्टमी बुधवारी (ता. ६) झाल्यावर दुसऱ्या …

Read More »

अंबिका तलावाची ग्रामपंचायतीकडून स्वच्छता

  स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कोगनोळी : येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अंबाबाई मंदिरालगत तलावातील मासे मृत होऊ लागले होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तलावाची स्वच्छता करून घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील म्हणाले, अंबिका तलाव हे गावाचे वैभव आहे. महिलांनी कपडे धुत असताना केमिकल युक्त कपडे व इतर साहित्य …

Read More »

कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर बंदोबस्त

  कोगनोळी : जालना येथे मराठा आरक्षण साठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांना पोलिसांच्या वतीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा निषेध म्हणून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व सरकारी वाहने टोलनाक्यावरून परत कर्नाटकात पाठवून …

Read More »

खानापूर तालुक्यातील शाळांचे विलीनीकरण नको : खानापूर तालुका समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे विलीनीकरण करू नये यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक सरकारने नुकताच पंधरा विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या 64 शाळा, कन्नड माध्यमाच्या …

Read More »

१३४ तालुक्यांच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर दुष्काळग्रस्तची अधिकृत घोषणा

  मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय बंगळूर : पावसाळ्यात जून आणि ऑगस्टमध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पाहणीनंतर राज्यातील १३४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले जातील, असे महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी पैशांऐवजी १० किलो तांदूळ : मंत्री मुनियप्पा

  बंगळूर : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पैशांऐवजी १० किलो तांदूळ दिला जाईल, असे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सोमवारी सांगितले. आज शहरात पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, राज्यातील ११४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. या तालुक्यांना १० किलो तांदूळ वाटपाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्यांमध्ये पाच किलो तांदळासाठी रोख …

Read More »