Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र

भाजप आमदारांनी रामाची, विठोबाची जागा लाटली; नवाब मलिकांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्यास भाजपचे मंत्री जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना …

Read More »

मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी …

Read More »

महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री! मिळाला पहिला बाधित रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमधील रुग्ण बाधित झाला आहे. तो 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीमध्ये आला होता. बाधित रुग्णाचे वय 33 आहे. बाधित तरुणाने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तो 35 जणांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांची तपासणी पूर्ण झाली आहे. बाधित रुग्ण दक्षिण …

Read More »

चंदगड तालुक्यातील दुर्गम काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलांना 10 सायकलींची भेट

चंदगड : चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुला-मुलींची धनगरवाडा ते सरकारी न्यु इंग्लिश हायस्कूल (7/8 किमी) चंदगडपर्यंतची व संध्याकाळी परत शाळा ते घर, अशी जंगलातील रस्त्यावरून होणारी दररोजची (15/16किमी) पायपीट ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून संपवली. याकामी व्हिक्टर फ्रांसिस, बबन कुगजी, अक्षय हुंशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेखा …

Read More »

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून …

Read More »

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणांची 18 लाखांची फसवणूक, शिप्पूरच्या बंटी-बबलीची करामत

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नेसरी परिसरातील दोघांना 18 लाख 8 हजार 996 रुपयांचा गंडा घालणार्‍या शिप्पूर तर्फ नेसरी येथील दोघा पती-पत्नी विरोधात नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍या अनेक गरजूवंतांची फसवणूक करणारी बंटी आणि …

Read More »

सतेज पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

अमल महाडिक यांची माघार कोल्हापूर : भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान …

Read More »

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित

कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद …

Read More »

न्हावेलीत गोवा दारू साठ्यावर छापा; एक लाख तीस हजारचा साठा हस्तगत, एकावर गुन्हा दाखल

चंदगड : न्हावेली ता. चंदगड येथे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु साठ्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकून एकूण 1 लाख 30 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी न्हावेली येथील आरोपी संतोष महादेव गावडे (पाटील) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संतोष याने घराच्या मागील बाजूस असलेल्या जनावारांच्या गोठ्यात दारूसाठा करून …

Read More »

विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत अन् साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत! : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे

पुणे : साहित्यिक प्रेम वाटतो, जाणिवा विकसित करतो; पण आजच्या साहित्यिकातील लेखक असंवेदनशील झाला असून, ही अराजकतेची सुरुवात आहे. भयामध्ये वावरणारा सामान्य माणूस आणि समाज आतला आवाज गमावून बसला आहे. लोक नको त्याचे समर्थन करू लागल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत. साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत. …

Read More »