Monday , December 8 2025
Breaking News

आईची तीन कोवळ्या मुलांसह आत्महत्या

Spread the love

 

विजयपुर येथील दुर्दैवी घटना

विजयपुर : विजयपुर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे.
पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पीडित महिलेने तिच्या तीन कोवळ्या मुलांसह पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली.

गीता रामू चौहान (३२) तिची तीन मुले सृष्टी (६), किशन (३), समर्थ (४) यांचा मृत्यू झाला. पती रामू आणि पत्नी गीता यांचे काल रात्री कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर गीता मुलांसोबत घराबाहेर पडली आणि पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली.
तिकोटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *