बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असून हवामान सूर्यप्रकाशित आहे. दरम्यान, 3 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
3 ऑगस्टनंतर किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव, बिदर, गदग, हावेरी, धारवाड, कलबुर्गी, यादगिरी, विजयपूर, विजयनगर, बळ्ळारी, बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, चिकमंगळूर, शिमोगा, दावणगेरे, हसन, कोडगू, मंड्या, रामनगर, म्हैसूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
आज राज्याच्या किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये, उत्तरेकडील अंतर्गत आणि दक्षिणेकडील अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे. बंगळुरूमध्ये ढगाळ वातावरण असेल.