Friday , December 12 2025
Breaking News

शालेय बस आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

Spread the love

 

बागलकोट : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील आळगुरु गावात शालेय वाहन आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आळगुरु गावातील श्री वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून शाळेच्या बसने कवटगी गावाकडे परतत असताना बस व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कवटगी येथील सागर कडकोळ (१७), श्वेता (१३), गोविंद (१३), बसवराज (१७) या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रहदारी पोलिस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *