Sunday , July 26 2026
Breaking News

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी घेतली आमदारांची भेट

Spread the love

समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन
बेळगाव : आनंद नगर रहिवाशी संघटना आणि उत्कर्ष महिला मंडळावतीने आमदार अभय पाटील यांची भेट घेवून आनंद नगर परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने नाल्यासंदर्भात समस्या मांडण्यात आली. आदर्श नगरपासून अन्नपूर्णेश्वर नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि सखल भागातील घरामध्ये शिरते तसेच परिसरातील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून पाणी दूषित होऊन रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत आमदार अभय पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त के. एच. जगदीश यांना तातडीने बोलावून घेऊन परिसराची पाहणी केली आणि लवकरात लवकर नाल्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आनंद नगर रहिवाशी संघटना तसेच उत्कर्ष महिला मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *