चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मल्लापूर गावाजवळ भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका मित्रासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संगनबसव(३६), खासगी बँकेत कर्मचारी, त्यांची पत्नी रेखा (२९), सात वर्षीय अगस्त्य, नातेवाईक भीमा शंकर आणि भीमाशंकर यांचा KGF मधील मित्र मधुसूदन …
Read More »ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली …
Read More »अजित पवार गटाला लवकरच जयंत पाटील पाठिंबा देण्याची शक्यता : सूत्र
मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीत ईडी (ED) कारवाईबाबत चर्चा झाल्याचं समजतं. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. या बैठकीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली …
Read More »भारत चौथ्यांदा चॅम्पियन!
चेन्नई : भारतीय हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर हा अंतिम फेरीचा थरारक सामना पार पडला. भारताने अवघ्या 11 मिनिटांत सामन्याला रंजक वळणे देत मलेशियाचा 4-3 असा पराभव करत चौथ्यांदा आशियाई …
Read More »भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय, मालिकेत 2-2 बरोबरी
यशस्वी आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने विंडिजचा नऊ विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 179 धावांचे आव्हान भारताने 18 चेंडू आणि 9 विकेट राखून सहज पार केले. यशस्वी जयस्वाल याने नाबाद 84 तर शुभमन गिल याने 77 धावांची खेळी केली. या विजयासह भारताने मालिकेत 2-2 अशी …
Read More »बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे विमानसेवा 1 ऑक्टोंबरपासून सुरु होणार!
बेळगाव : बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार असल्याची माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे. 1 ऑक्टोंबर पासून बेळगाव-दिल्ली दररोजची विमानसेवा सुरू होईल तर 29 ऑक्टोबर पासून स्टार एअरची बेळगाव-पुणे ही दररोजची विमानसेवा तर पुणे-बेळगाव ही इंडीगोची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होणार …
Read More »शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक!
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. …
Read More »शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी; 14 लाखाचा मुद्देमाल लंपास
बेळगाव : बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 14 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गोंधळी गल्ली येथे घडली आहे. शहरात झालेल्या धाडसी घरफोडीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंधळी गल्ली …
Read More »प्रत्येकाने अभिमानाने घरावर राष्ट्रध्वज फडकवा : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले. 13 ते 15 असे तीन दिवस जिल्ह्यातील घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून सर्वांच्या मनात देशभक्ती रुजविणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेनेही स्वेच्छेने सहभागी होऊन …
Read More »बिजगर्णीत ‘माझी माती, माझा देश’ अभियान सोहळा संपन्न
बेळगाव : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ अभियान, आजपासून बिजगर्णी गावातून सुरुवात करण्यात आली. जवळपास एक हजार हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पर्यावरण रक्षण कसे आणि का.. करावे याची माहिती सुभेदार हरीचंद्र शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात मराठा लाईट इन्फंट्री, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta