Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

काळ्या दिनाच्या जागृतीसाठी खानापूर तालुक्यातील गावोगावी संपर्क दौरे

  खानापूर (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जाण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावातून गावोगावी दौरे काढून काळ्यादिनी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी लागलीच संपर्क दौऱ्याला प्रारंभ करू, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारक सभागृहात बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून …

Read More »

उच्च न्यायालयाने बीएमसीला खडसावले; ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश

  मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार …

Read More »

भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल : आबासाहेब दळवी

नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते …

Read More »

पावसाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

  बेळगाव : पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या देखरेख करून घरांच्या नुकसानीच्या नोंदी करून घ्याव्यात जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना घराच्या नुकसानीसंदर्भात अतिरिक्त भरपाईचे वितरण करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याचे …

Read More »

काळ्यादिनीसंदर्भात समितीकडून गावोगावी जनजागृती

  बेळगाव : दि.१२ रोजी कुद्रेमनी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गावोगावी जाऊन करत आहेत. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार …

Read More »

अरविंद केजरीवाल नोव्हेंबरमध्ये बेळगावात

  बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात राज्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढील महिन्यात बेळगावला भेट देणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी दिली आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचारात …

Read More »

चन्नराज हट्टीहोळी यांचा उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

  बेळगाव : केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बुधवारी बेळगावात आयोजित केलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. रेल्वे विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांकडे दुर्लक्ष करून शिष्टाचाराचा भंग केला. या पार्श्वभूमीवर मी …

Read More »

गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर खड्डा बुजविण्यासाठी शेडूमिश्रीत माती, पीडब्लूडीचा निष्काळजीपणा

    खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या कणवीजवळील गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर भला मोठा खड्डा पडून महिना होत आला. मात्र खानापूर पीडब्लूडी खात्याने भर रस्त्यावरील खड्ड्यात ट्रॅक्टर भर शेडूमिश्रीत माती सोडून गेली आहे. खड्डा दुरूस्तीचे काम राहिले बाजुला या मातीच्या ढीगामुळे वाहतुकीला धोका झाला आहे. महिना ओलांडुन गेला तरी …

Read More »

हेम्माडगा- अनमोड रस्ता १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीस बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजीपर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. …

Read More »

महिलांनी स्वावलंबी बनावे : डॉ. रवी पाटील

  बेळगाव : दीपावली सणानिमित्त विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटरचे डॉ. रवी पाटील यांच्या वतीने येथील अयोध्या नगर मधील महिला मंडळाला पणत्या देण्यात आल्या. दरवर्षी दीपावली सणानिमित्त डॉ. रवी पाटील शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरात पणत्या पेटाव्यात आणि त्यांची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने त्या वितरित करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षीही त्यांनी …

Read More »