Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

बंगळुरू-हुबळीसह 5 ‘वंदेभारत एक्सप्रेस’ना एकाच दिवशी हिरवा झेंडा

  नवी दिल्ली : देशाची पहीली सेमी हायस्पीड विना इंजिनाची ट्रेन ‘वंदेभारत एक्सप्रेस’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेग आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेल्या या गाड्या देशातील विविध राज्यात चालविल्या जात आहेत. धार्मिक पर्यटनासाठी देखील वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आता येत्या 26 जून रोजी देशातील आणखी पाच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेसना …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलविण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका आरोग्य केंद्र कार्यालयावर मराठी भाषेत फलक लावावा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 मे 2023 रोजी …

Read More »

ममदापूरच्या गौरी कदम मिळविले नीट परीक्षेत तब्बल ६२५ गुण

  ग्रामीण भागातील मुलीचे कौतुक : भविष्यात देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा निपाणी (वार्ता) : सततचे मार्गदर्शन, कोचिंग क्लासेस मुळेच शहरी भागातील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेत असल्याचे बोलले जाते. मात्र ममदापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या गौरी शरद कदम हिने नीट परीक्षेमध्ये तब्बल ६२५ घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या …

Read More »

पारिजात कॉलनीत दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून भ्रष्टाचार; रमाकांत कोंडुस्कर

  बेळगाव : वडगाव- अनगोळ रोड येथील पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यात दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून जनतेच्या पैशाची उधळण होत आहे. प्रशासनाने भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे. पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यापुर्वी गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. पण गटारीच्या शेजारील जागेत …

Read More »

ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

  बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दि. १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. त्यांनी आजवर झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या चर्चेत ऍड. सुधीर चव्हाण, कॉ. सुभाष कंग्राळकर, प्रा. दत्ता …

Read More »

हलकर्णी येथील मऱ्याम्मा देवीच्या यात्रेला भाविकांची गर्दी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत मऱ्याम्मा देवीची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवार दि. १३ व बुधवारी दि. १४ असे दिवस साजरी करण्यात आली. यावेळी मंगळवारी सकाळी मऱ्याम्मा देवीला अभिषेक, विधीवत पुजा व गाऱ्हाणे घालुन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मानकऱ्यांच्या ओट्यावर भरून …

Read More »

टॉप रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा, ट्रॅव्हिस हेड-स्टीव्ह स्मिथची झेप!

  जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मात देत विजेतेपदावर नाव कोरले. त्याचबरोबर ताज्या टेस्ट रँकिंगमध्येही त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. खेळाडूंच्या रँकिंगमध्ये टॉपच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाच दबदबा पहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांना जबरदस्त फायदा मिळवला आहे, तर …

Read More »

शहराच्या पाणी प्रश्नाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

  प्रा.सुरेश कांबळे; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील सद्यस्थितीत विचार करता पाहण्यासाठी होणारी हेळसांड पाहता अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशा प्रकारची गंभीर व भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आशा भीषण परिस्थितीमध्ये …

Read More »

अपघातात जखमी झालेल्या युवकाचे निधन

  बेळगाव : खानापूर जवळ झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शुभम लक्ष्मीकांत जाधव रा. शास्त्री नगर बेळगाव बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. खानापूर येथून येत असतांना गेल्या गुरुवारी 8 जून रोजी हत्तरवाड जवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात शुभम गंभीर …

Read More »

हलकर्णी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष; गटारीत घाणीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन लागुन असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सध्या पावसाची सुरूवात होत आहे. त्यामुळे गटारीत घाणीचे साम्राज्य असल्याने घाणीचे दुर्गंधी तसेच गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास नागरीकांना होऊन त्यातच डासांचा उपद्रव वाढला आहे. तेव्हा …

Read More »