Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य : मंत्री सतीश जारकीहोळी

  विकास आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस बेळगाव : स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी; पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट; स्मशानभूमी विकास, पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आहे. याबाबत सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश …

Read More »

जवाहर तलावातील गाळ तात्काळ न काढल्यास आंदोलन

  श्रीराम सेना हिंदुस्तानचा इशारा; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस सुरू न …

Read More »

मुन्सिपल हायस्कूलमध्ये भरली ३० वर्षांनी आठवणींची शाळा

शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार : जुन्या आठवणींना उजाळा निपाणी (वार्ता) : शाळा, कॉलेजचे दिवस संपल्यावर प्रत्येकजण आपापल्या जीवनात वेगळ्या क्षेत्रामध्ये मग्न होऊन जातो. तरीही शाळेतील आठवणी आणि गप्पा-गोष्टीना उजाळा देण्यासाठी मुन्सिपल हायस्कूलयेथील सन १९९२-९३ च्या दहावीतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन ३० वर्षांनी अनेक आठवणीना उजाळा देत पुन्हा एकदा आठवणींची शाळा …

Read More »

कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक

  लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे आज (7 जून) हिंदुत्ववादी संघटनेला पुकारलेला बंद आणि केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंगळवारी (6 जून) दुपारी आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर शहरात व्हायरल मेसेजवरुन परिस्थितीचा अंदाज असतानाही पोलीस यंत्रणेला हिंसक जमावाला पांगवण्यासाठी तब्बल अडीच तास …

Read More »

कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय

  कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग …

Read More »

कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर

  परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे गृहखात्याचे निर्देश कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला …

Read More »

तालुका समिती याचा खुलासा करणार का?

चौगुले कुटुंबियांचा मनोहर किणेकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील यांना सवाल बेळगाव : तालुका म. ए. समितीच्या 26 मे रोजी झालेल्या बैठकीत एस. एल. चौगुले, सरोजनी चौगुले आणि अशोक चौगुले यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईचा ठराव करण्यात आला. त्यामुळे चौगुले कुटुंबियांनी आमच्यावर कशाच्या आधारावर आणि कोणाच्या सांगण्यावर कारवाई करण्यात आली, असा सवाल तालुका …

Read More »

पालकमंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज आढावा बैठक

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर स्मार्ट सिटी, बुडा आणि पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. महापौरांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या सभेत नगरसेवकांनी प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेषत: भाजपचे सदस्य नाराज असून आज दोन्ही मंत्र्यांच्या …

Read More »

कर्जमाफी, विज मोफत न दिल्यास आंदोलन

  विणकर व्यवसायिकांचा इशारा : निपाणी तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात ५५ लाखापेक्षा अधिक विणकर आहेत.५ लाख लोक या व्यावसात गुंतले आहेत. दुष्काळ, पडझड, अतिवृष्टी, नोटा बंदी, जीएसटी आणि कोविड यांसारख्या दुष्परिणामांमुळे पुरेशा सरकारी योजना गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. मुलांचे शिक्षण, सुत बाजारातील असुरक्षिततेमुळे कर्जाला कंटाळून विणकर व्यवसायिक आत्महत्या …

Read More »

दुचाकी धडकेत मिरज मधील सेवानिवृत्त एसटी चालकाचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बेळगाव नाक्याजवळील खरी कॉर्नर आझाद गल्ली येथे दुचाकीची एकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात महंमदहनीफ दस्तगीर मुजावर (वय ६२ रा. मिरज) यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा अपघात झाला. त्याची शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, …

Read More »