Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

काँग्रेस नेते साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांची धाड

  बेळगांव : काँग्रेस नेते व्ही. एस. साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. बेळगांव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील सहकारी बँकेवर गोवा विभागाच्या आयटी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. आयटी अधिकाऱ्यांनी बँकेतील सुमारे 265 लॉकर्स ची …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरपीडी महाविद्यालयाला भेट देत स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या आवारातील विविध इमारतींची …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज गोवावेस) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र …

Read More »

खानापूरात भाजपकडून डॉ. सोनाली सरनोबत यांचे नाव आघाडीवर

  खानापूर : खानापूर विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू आहे. विठ्ठल हलगेकर हे जरी भाजपचे प्रबळ दावेदार असले तरी नियती फौंडेशनच्या अध्यक्षा भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना ग्रामीण भागातील महिला वर्गाची पहिली पसंती आहेत. तथापि भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद कोचेरी हे देखील भाजप उमेदवारीसाठी इच्छुक …

Read More »

डास मारण्यासाठी लावलेली कॉइल ठरली जीवघेणी; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा तडफडून मृत्यू

  नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका धक्कादायक घटनेमुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. कारण शास्त्री पार्क येथील एकाच घरातील ६ लोकांचा डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉईलमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यापैकी अनेकजण घरातील डास मारण्यासाठी किंवा त्यांना पळवण्यासाठी घरामध्ये कॉईल लावतात. पण याच कॉईलने सहा जणांचा …

Read More »

खानापूरच्या ‘त्या’ सूर्याजी पिसाळांचा मध्यवर्तीच्या बैठकीत जाहीर निषेध

  बेळगाव : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीत खोडा घालून बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे कुठेही असा प्रकार झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. असा कडक इशाराही देण्यात आला आहे. मध्यवर्तीच्या बैठकीत खानापूर येथील समितीत बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबाबत चर्चा झाली. यावेळी …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानचे शेकडो कार्यकर्ते म. ए. समितीत सामील

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे काम करण्यास सज्ज आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीपूर्वी अनगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती समिती अध्यक्ष …

Read More »

एकाच कुटूंबातील चौघांची मंगळूरात लॉजमध्ये आत्महत्या

  कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय बंगळूर : मंगळुरू येथील एका लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. म्हैसूरमधील विजयनगर येथील देवेंद्र (वय ४६), त्यांची पत्नी आणि अनुक्रमे १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींचा आत्महत्या केलेल्यांमध्ये समावेश आहे. देवेंद्रने कथितरित्या मंगळुरमधील के. एस. राव रोडवरील करुणा रेसिडेन्सी येथील …

Read More »

विजयेंद्र शिकारीपूरमधून, ‘वरुणा’तून नाही : येडियुरप्पांचे स्पष्टीकरण

  बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुनरुच्चार केला आहे की मुलगा विजयेंद्र यांनी वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांनी यावेळी मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहावे. आज म्हैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले की, हायकमांडने विजयेंद्र यांना वरुणमधून उमेदवारी देण्याचे मान्य केले …

Read More »

खानापूर तालुक्यातील दहा विद्यार्थी नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीचे शिकार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील जवळ जवळ दहा विद्यार्थी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचे (NEP) चे बळी ठरले आहेत. बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळविताना कसरत न करता प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता राज्य सरकारने UUCMS नावाचे संगणक वेबसाइट तयार केले. त्यामुळे विद्यार्थी त्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवेश घेतात. पुढे …

Read More »