आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर …
Read More »मुख्यमंत्री, आमदारांना पत्रे; युवा समितीकडून मोहिमेत सहभागी होण्याची विनंती
बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिनी पत्र पाठवून लक्ष वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहीमेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी सहभागी व्हावे यासाठी युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार!
बेळगाव (वार्ता) : हनमन्नावर गल्ली अनगोळ येथे गेल्या दोन-तीन वर्षापासून ३०-३५ वर्षीय अनोळखी महिला फिरत होती. तिला कुटुंबाचा आधार नव्हता. तेथील नागरिक तिला अन्न पाणी देऊन तिची भूक भागवत होते. पण हल्ली तिचे मानसिक संतुलन खूपच बिघडल्याने ती तेथील नागरिकांना शिवीगाळ करत होती व नग्नावस्थेत फिरत होती. येथील नागरिकांना, महिला …
Read More »तालुक्याच्या प्रत्येक ग्रा. पं.तीत होणार कचरा डेपोचे आयोजन
खानापूर (सुहास पाटील याजकडून) : खानापूर तालुक्यात एकूण ५१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी ३८ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ३ एकर जमिनीत हा कचरा डेपोचे आयोजन करण्यात येणार आहे.यापैकी नंदगड ग्राम पंचायतीने कचरा डेपो कामाचा शुभारंभ केला असून याठिकाणच्या कचरा डेपोत गावातील प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाॅटल, कचरा असा वेगळा केला जातो. …
Read More »सेवानिवृत्तीनिमित्त बुवाजी व गुरव यांचा सत्कार
बेळगाव : हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कुल येथील मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तर बडकू गुरव हे ४४ वर्षांच्या प्रदीप सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्याबाबत त्यांचा शाळा सुधारणा कमिटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी बुवाजी व गुरव यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूरातून गुरव गल्ली व घाडी गल्लीतून पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य …
Read More »हाळ झुंजवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या धक्कादायक
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका प्रशासन कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही.त्यामुळे अशा कर्जबाजारीला शेतकरी कंटाळून आणि अनेक संकटाना त्रासुन गळफास घेणे, किटकनाशक प्राशन करणे, नदीत उडी मारून जीव देणे असे प्रकार घडतात. मात्र यामागचे कारण तालुका प्रशासन शोधुन …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूर मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूर मराठी पत्रकार संघटनेचा पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार सहकार्य …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमाला खानापूर वकील संघटनेचा पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित …
Read More »कणकुंबी भागातील ४५ वर्षावरील ९०% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस : आरोग्यधिकारी डॉ. बी. टी. चेतन
बेळगाव (वार्ता) : कोरोना काळात जनतेला वैद्यकीय सेवेसाठी विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र योग्य नियोजनाद्वारे कणकुंबी परिसरातील ३२ गावातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्याचे काम कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील ४५ वर्षावरील ९०% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta