Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

निरंजन देसाई यांच्याकडून खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन देसाई यांनी खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत.मंगळवारी शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरदेसाई यांनी तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळ देसाई यांच्याकडे पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी खानापूर तालुक्यात युवा समिती व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना …

Read More »

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी घेतली आमदारांची भेट

समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासनबेळगाव : आनंद नगर रहिवाशी संघटना आणि उत्कर्ष महिला मंडळावतीने आमदार अभय पाटील यांची भेट घेवून आनंद नगर परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने नाल्यासंदर्भात समस्या मांडण्यात आली. आदर्श नगरपासून अन्नपूर्णेश्वर नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी …

Read More »

कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून …

Read More »

बेळगावात लसीकरणाचे राजकारण आणि लोकप्रतिनिधींची मक्तेदारी : शुभम शेळके यांचा आरोप

बेळगाव : भारत सरकारकडून देशातील जनतेला मोफत लस दिली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावावर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी स्वतःची जाहिरातबाजी चालवली आहे. सरकारकडून येत असलेल्या लसींवर बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. बेळगावात लसीकरणावरून सुरू असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य …

Read More »

लसीकरणावरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक

आंदोलननगर केंद्रातील घटना :150 जणांना दिली लस निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांसह लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी निपाणी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. मात्र येथील आंदोलननगर लसीकरण केंद्रावर लसीकरणामध्ये राजकारण होत असल्याचे सांगून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर या केंद्रावर 150 जणांना लसीकरण करण्यात …

Read More »

कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकच

महावीर बोरण्णावर : शहरात विविध ठिकाणी लसीकरण निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अजूनही नागरिकांमध्ये लसीकरणाची भीती व्यक्त होत आहे. पण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. सध्या शहर आणि परिसर अनलॉक झाला असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, …

Read More »

तालुक्यात कोरोना काळात मिरची पिकाचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात खानापूर तालुक्यातील बिडी सर्कलमधील झुंजवाड के जी गावातील सर्वे नंबर १४६ /४ मधील शेतकरी कौशल्या बाळेकुंद्री यांच्या शेतातील मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.मिरचीची लागवड केल्यापासुन कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकही बंद झाली. त्यात हातातोंडाशी आलेली मिरची पिक काढणे शक्य झाले नाही. लाखो रूपये …

Read More »

बेकवाड – हलशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ते हलशी या आप्रोच रस्त्याची फार भयंकर दुर्दशा झाली असुन खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावर पाणी साचले आहे.या रस्त्यावरून कारखान्याला जाणाऱ्या अवजड वाहनातुन ८० टन माल वाहतुक वर्षभर केली जाते. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. …

Read More »

महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला महांतेश कवटगीमठांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी अचानक खानापूर तालुक्याच्या भेटीवर आलेल्या एमएलसी व मुख्यमंत्री सचेत महांतेश कवटगीमठांनी शांतिनिकेतन स्कूलमध्ये आयोजित केलेल्या व महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती समितीच्यावतीने व श्रीमहालक्ष्मी ग्रुप, राष्ट्रीय संघ, व जनकल्याण ट्रस्ट यांच्यावतीने सुरू केलेल्या महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट दिली.यावेळी कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी पुष्पगुच्छ …

Read More »

भावी मुख्यमंत्रिपदावरून कर्नाटक कॉंग्रेसमध्ये वाद

बंगळूर : एकीकडे राज्य कोरोना महामारीने हैराण झालेले असतानाच कर्नाटकातील राजकीय पक्षांना सत्तेचे डोहाळे लागले आहेत. भाजप व कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार नेतृत्वावरून वाद घालीत आहेत. मुख्यमंत्रिपदावरून एकमेकाला शह-प्रतिशह देण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेतेही आहेत. भाजपमधील नेतृत्वाचा वाद काहीसा शांत झालेला असताना आता भावी मुख्यमंत्री कोण? …

Read More »