Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

चापगांव परिसरातील शेतवडीत वीज कोसळून 11 बकरी मृत्युमुखी…

  खानापूर : खानापूर तालुक्यात आज सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. याचदरम्यान चापगांव येथील शेतवडीत सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी वीज कोसळल्याने एका धनगराची 11 बकरी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर धनगराचे नाव उमेश यल्लाप्पा चिचडी, राहणार होण्णनूर तालुका बैलहोंगल असे आहे. चापगांव येथील मानीतील तलाव …

Read More »

खानापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

  खानापूर : खानापूर तालुका परिसरात आज दुपारच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे, खानपूर-नंदगड रस्त्यावर करंबळ गावाजवळ एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक एक तासाहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी झाडाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. …

Read More »

विविध मागण्यासाठी स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांचा जिल्हा पंचायतीवर मोर्चा

  बेळगाव : पंचायत व्याप्तींमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सकाळी बेळगाव जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत …

Read More »

फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू

  जोयडा : फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चापोली या ठिकाणी घडली आहे. सदर अस्वल 14 ते 15 वर्षाचे असून मादी जातीचे आहे. जोयडा तालुक्यातील चापोली घाटामध्ये रस्त्यावर असलेल्या फणसाच्या झाडावर चढून फणस खात असताना झाडाच्या बाजूने गेलेल्या 11 के व्ही च्या …

Read More »

संतीबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव रस्त्यावर…

  बेळगाव : पवित्र कुराण जाळल्याच्या घटनेनंतर संतीबस्तवाड गावात तसेच बेळगावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील नागरिक आज संध्याकाळी रस्त्यावर उतरले असून दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करून पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि अटक करण्यातील विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केला. पोलिस आयुक्तांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना आश्वासन देऊन सांगितले …

Read More »

दलित उद्योजकांसाठी बेळगावात १४ मे रोजी ‘नवोद्यम’ मेळाव्याचे आयोजन

बेळगाव : दलित उद्योजकांची संख्या वाढावी आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बेळगाव येथे १४ मे रोजी एका ‘नवोद्यम’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक दलित उद्यमी संघर्ष समितीचे अरविंद गट्टी यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गट्टी यांनी सांगितले की, हा मेळावा १४ मे रोजी …

Read More »

गर्लगुंजी येथील वेंटेड डॅमचे काम त्वरित करा : सहाय्यक कृषी निर्देशकांना निवेदन

खानापूर : गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप यांना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे …

Read More »

‘किंग कोहली’ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

  मुंबई : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदयभंग झालाय हे निश्चितच! सोशल …

Read More »

मनगुती येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

  दड्डी : मनगुती ता. हुक्केरी येथील प्राथमिक मराठी शाळा मनगुती व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनगुती येथे ई. 2001-2002.. मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. तब्बल 25 वर्षांनी या कार्यक्रमाचे नियोजन झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास …

Read More »

प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुबण्णा अय्यपन यांचा मृतदेह सापडला कावेरी नदीत; आत्महत्त्येचा संशय

    बंगळूर : श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीत प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुब्बण्णा अय्यप्पन यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे. प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बण्णा अय्यप्पन यांचा शनिवारी संध्याकाळी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण तालुक्यातील साई आश्रमाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्बण्णा हे त्यांच्या पत्नीसोबत म्हैसूरमधील विश्वेश्वरय्या नगरमधील एका …

Read More »