बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी तर चिटणीसपदी सुरेन्द्र देसाई यांची फेरनिवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी सदस्यांची बैठक विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी पुढील पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निवडण्यात आले. उपाध्यक्ष के.एल. मजूकर, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार …
Read More »जांबोटी पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक व सचिव बेपत्ता
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक खंडोबा राऊत व सचिव श्रीनाथ खाडे हे अचानक बेपत्ता झाल्याने सोसायटीचे कामकाज ठप्प झाले आहे. या घटनेमुळे सोसायटीच्या दैनंदिन कामकाजावर आणि निवडणुकीत अडथळा निर्माण झाला आहे. यासाठी सोसायटीच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार …
Read More »विज्ञान स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक
कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान वाचन गोष्टी स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती जोपासण्यासाठी व त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत. विज्ञान स्पर्धा व कृतियुक्त शिक्षणामुळे विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होवून कल्पकतेला चालना मिळते, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली!
येळ्ळूर : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळर’च्यावतीने सीमासत्याग्रही कै. सुभाष यल्लोजी कदम, पैलवान कै. गोविंद वासुदेव कुगजी, हाडाचे वैद्य कै. परशराम ओमाण्णा धामणेकर, निवृत्त शिक्षक कै. चांगदेव भरमाजी उडकेकर, मारुती नागोजी उघाडे, कै. लक्ष्मीबाई गुंडू गोरल, कै. राजाराम सुबराव पाटील, कै. अनंत यल्लापा पाटील, भारतीय सैनिक कै. राहुल आनंदा गोरल …
Read More »“महाराष्ट्र राज्य” फलक येळ्ळूर : आज चौथ्या खटल्याचा निकाल
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अशांतता निर्माण झाली होती, याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल आज ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद …
Read More »सीमाभागात मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सोपी करावी
रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची भेट बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सीमाभागात अधिक सोपी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्याकडे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सीमाभागातील रुग्णांना तातडीने आणि सुलभतेने मदत मिळावी यासाठी प्रणाली सुधारण्याबाबत विचारविनिमय …
Read More »सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक; तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी यासाठी प्रयत्न करणार बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी. याचिका मुख्य पटलावर घेण्यात यावी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात आयोजित तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …
Read More »गाळेधारकांच्या नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन; नगरपालिका गाळेधारकांचा इशारा
नगरपालिकेच्या नोटीसीमुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतर्फे शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त आदेशानुसार गाळे रिकामी करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानंतर या गाळ्यांचा फेरलिलाव केला जाणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.गाळेधारकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त …
Read More »मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलेल्या ऑटो चालकाची आत्महत्या
बेळगाव : बुधवारी बेळगावातील किल्ला तलावात एका ऑटो चालकाने उडी मारून जीवन संपवले. मृत व्यक्तीची ओळख बेळगावच्या कंग्राळी येथील किरण मनगुतकर (५४) अशी झाली आहे.किरण मनगुतकर यांनी एक वर्षापूर्वी मुलीचे लग्न केले होते. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सवलती द्याव्यात; रमाकांत कोंडुसकर यांची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये खुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. उच्च शिक्षणात मिळणाऱ्या सवलतींप्रमाणेच प्राथमिक विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तज्ञ समितीच्या बैठकीदरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta