Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

नेरसा येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा येथे आपल्या शेतातील फणसाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील नेरसा येथे घडली आहे. सदर घटना गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे. परंतु शुक्रवारी सकाळी उजेडात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नेरसा येथील रहिवासी निलेश हैबतराव …

Read More »

युवा समितीची व्यापक बैठक उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १५/२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत मराठी भाषा गौरव दिन, सामान्यज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन आणि इतर विषयावर निर्णय घेण्यात येणार आहेत …

Read More »

नाट्यदिंडीच्या रूपात रसिकांना सहा नाटकाची मेजवानी

  बेळगाव : बेळगाव शहर हे कलारसिकांचे शहर आहे. या शहराला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये मराठी नाटकांच्या समोरील पेचप्रसंग अधिक जटिल होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता बेळगावचे मराठी नाट्य वैभव सुरक्षित ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा पुढे सरसावली आहे. नाट्यदिंडी या उपक्रमाच्या …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूरच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

  बेळगाव : देशाचं नेतृत्व क्रीडा मैदानावर तयार होत असते त्यासाठी प्रत्येकाने क्रीडा मैदानावर परिश्रम घेतले पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये नैसर्गिक क्रीडा गुण उपजत असतात त्याचा विकास करणे महत्त्वाचे असते. बक्षीसे पदके मिळवण्यापेक्षा स्वतःला सदृढ ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. क्रीडा सरावाबरोबरच योगा अंगीकृत करा असे …

Read More »

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी ट्रम्प यांची मान्यता

  नवी दिल्ली : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला आणि भविष्यात आणखी प्रत्यार्पणाचे संकेत दिले. “आम्ही एका अतिशय हिंसक …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पदवीत्तर शिकवण्यात यावा : साहित्यिक अर्जुन जाधव यांची मागणी

  मुंबई : अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याचा संपूर्ण इतिहास माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी ते पदवीत्तर अभ्यासक्रमात शिकवण्यासाठी समाविष्ट करण्यात यावा.अशी मागणी साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा, धाडसीपणाचा, शासन व प्रशासन …

Read More »

बेळगावात ताल ऋषी पंडित आनिंदो चटर्जी यांच्या ‘तपस्या’ पुस्तकाचे अनावरण

  बेळगाव : डॉ. प्रकाश रायकर फाउंडेशन यांच्यावतीने बेळगावात ताल ऋषी पंडित आनिंदो चटर्जी यांच्या ‘तपस्या’ पुस्तकाचे अनावरण तसेच श्री. विशाल मोडक यांचा “गंडा बंधन” सोहळा. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी 5 वाजता गोगटे कॉलेजच्या के के वेणूगोपाल सभागृहात हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला खूप मोठे मान्यवर मोठे …

Read More »

व्होल्वोकडून राज्यात १,४०० कोटीची गुंतवणूक

  करारावर स्वाक्षरी; जागतिक गुंतवणूकदार परिषदेस वाढता प्रतिसाद बंगळूर : बस आणि ट्रकच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वीडिश-आधारित व्होल्वोने होस्कोटमधील त्यांच्या उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी १,४०० कोटी रुपये गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथे गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत या संदर्भातील करारावर स्वाक्षरी …

Read More »

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

  मुंबई : काँग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

ऊसाच्या फडाला लागलेली आग विझविताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; कारलगा येथील दुर्दैवी घटना

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथे उसाच्या फडाला लागल्याने ती आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारलगा येथील एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार (वय 75) असे आहे. सदर शेतकरी …

Read More »