Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यासाठी २७ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. जय …

Read More »

कराच्या पैशातून नुकसानभरपाई देण्याचा महापालिकेच्या विशेष बैठकीत निर्णय

  बेळगाव : बेळगाव महापालिकेला कराच्या पैशातून शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलमधून जुने पी. बी. रोडपर्यंतच्या रस्ते बांधणीत घरे गमावलेल्यांना भरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. धारवाड उच्च न्यायालयाने २० कोटी भरपाईची रक्कम बेळगाव महापालिकेला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार आसिफ सेठ म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लवकरच मुंबईत ठिय्या आंदोलन

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लवकर मुख्यमंत्री व समन्वयक मंत्र्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज मंगळवार दि. २७ रोजी मराठा मंदिर …

Read More »

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे

  राजू पोवार; भाग्यलक्ष्मी संस्थेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. शिवाय दिवसेंदिवस शिक्षण महागडे बनत चालले आहे. तरीही नोकरी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार …

Read More »

मूर्ती कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने माफी मागावी : मृणाल हेब्बाळकर

  बेळगाव : राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पडझडीबाबत भाजप नेते मौन बाळगून आहेत, अशी गंभीर टीका काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी केली आहे. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव …

Read More »

खर्गे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप

    बंगळुरू : काही दिवसांपूर्वीच कथित मुडा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता मल्लिकार्जुन खर्गे यांचे कुटुंबिय सदस्य असलेल्या संस्थेला कर्नाटक सरकारने उद्योगांसाठी राखीव असलेली जमीन दिल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला …

Read More »

इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहाने संपन्न

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहाने पार पडला. श्री श्री गोकुलानंद मंदिरात आठवडाभर विविध कार्यक्रम संपन्न झाले. सोमवारी मध्यरात्री जन्माष्टमी उत्सवाची सांगता इस्कॉन चे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या जन्माष्टमी वरील व्याख्यानाने झाली. तर मंगळवारी संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन व्यासपूजा …

Read More »

राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या वेटलिफ्टिंग टीमचे घवघवीत यश

  बेळगाव : म्हैसूर येथे झालेला कर्नाटक स्टेट वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत बेळगावच्या एकूण 16 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी स्वस्तिका मिरजकर हिने 87 वजनी गटात सुवर्णपदक, रोहित मुरकुटे यांने 55 किलो वजनी गटात सुवर्ण, समीक्षा मानमोडे हिने 59 किलो वजनी गटात सुवर्ण, आदर्श धायगोंडे याने 81 किलो वजनी …

Read More »

मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : मलप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाचा विचार करता धरणाची पूर्ण पातळी २०७९.५० फुटांच्या तुलनेत २०७८.१० फुटांवर पोहोचली आहे. मलप्रभा धरणात सध्याची आवक १० हजार क्युसेक आहे. धरणाची पातळी राखण्यासाठी मलप्रभा धरणातून पाणी सोडण्यात वाढ करण्यात येणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आज दिनांक २७-०८-२०२४ रोजी सायंकाळी …

Read More »

संत ज्ञानेश्वरांनीही विज्ञाननिष्ठ जाणिवेतून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला : प्रा. अशोक आलगोंडी

  कागवाड येथे ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे सामूहिक पारायण कागवाड : वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, व्रत-वैकल्य काढून टाकण्याचे महान काम केले. संत ज्ञानेश्वरांनीही विज्ञाननिष्ठ जाणिवेतून ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी व भगवत गीता या दोन ग्रंथांमध्ये अर्जुन आणि कृष्ण या दोघांचा सुसंवाद असला तरी जीवनाची महत्त्वाची मूल्ये, आचरणातील समीकरणे सुलभ करून …

Read More »