Sunday , July 26 2026
Breaking News

देवाची भक्ती आणि माणसांवर प्रेम असेल तर जीवन सार्थक होते : चन्नराज हट्टीहोळी

Spread the love

 

बेळगाव : लोकांमध्ये देवाची भक्ती आणि प्रेम असेल तरच जीवन सार्थक होते, असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. मरडीनागलापुर गावात श्री अक्कनागलांबिके मंदिराच्या प्रवेशद्वार उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. देवाची भक्ती माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाज सुरळीत चालण्यासाठी देवाची कृपा असावी. तसेच आपण आपल्या सभोवतालच्या लोकांवर प्रेम केले पाहिजे.

ते म्हणाले की, जेव्हा एखाद्याला सर्वांचे प्रेम आणि विश्वास प्राप्त होतो तेव्हा माणसाच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो.

यावेळी ग्रामस्थ, जिल्हा पंचायत माजी सदस्या रोहिणी बा. पाटील, यल्लाप्पा करविनकोप्प, नागेश शिंदे, सुरेश मेकलमर्डी, उद्दाप्पा वन्नूर, वीरप्पा देशनुर व मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *