Monday , April 20 2026
Breaking News

यशस्वी उद्योजक होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक : राजीव दोड्डन्नवर

Spread the love

 

बेळगाव : जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत. त्यांनी सतत बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भारतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नवर यांनी व्यक्त केले.
नुकतेच भारतेश एज्युकेशन ट्रस्टच्या ग्लोबल बिझनेस स्कूलने M.B.A. 2020-2022 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या पदवी दिन आणि समापन समारंभाचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, कॉर्पोरेट जगात सतत अभ्यास करणे आवश्यक आहे. मॅनेजमेंट टीम आणि प्रोफेशनल टीमसोबत काम करताना अनुभव वाढतो. हा अनुभव यशासाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला जैन इंजिनिअरिंग लि. संस्थेच्या मुख्य मार्केटिंग अधिकारी श्रीमती अनुपमा शिरहट्टी म्हणाल्या की, खरे शिक्षण पदव्युत्तर शिक्षणानंतर सुरू होते. बाजार हा खरा शिक्षक म्हणून काम करतो. प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवण्यासाठी आव्हानांचा सामना करण्याची क्षमता असायला हवी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक महावीर उपाध्ये होते. डॉ. ए.आर. रोट्टी यांनी वार्षिक उपक्रमांची माहिती दिली. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी डॉ. प्रसाद दड्डीकर यांनी शपथविधी केला. 2020-22 च्या बॅचमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून संजना कुंडेकर आणि शिवानी सर्वोत्कृष्ट ग्रंथालय वापरकर्ता म्हणून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतेश एज्युकेशन ट्रस्टचे बोर्ड सदस्य, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *