Tuesday , May 26 2026
Breaking News

महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Spread the love

 

रायबाग : रायबाग जवळील पालभावी येथील विवाहित महिलेने आपल्या दोन्ही मुलींना पाठीला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत सकाळी 11 वाजता सरस्वती नितीन किरवे (वय 26) हिने आपल्या दोन मुली दीपिका (वय 7) आणि रितिका (वय 4) यांच्यासह विहिरीत उडी घेतली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 2016 मध्ये रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावातील सरस्वती हिचा विवाह सांगली शहरातील नितीन किरवे याच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुली होत्या. सरस्वती ही सासरच्या जाचाला कंटाळून मागील आठ महिन्यांपासून सुलतानपूर गावात आपल्या घरी मुलींसह राहत होती. पती आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून सरस्वती यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
सदर घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आयटी क्षेत्रातील नोकर कपातीवर शरद पवारांकडे निवेदन; कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी

Spread the love  मुंबई : माननीय खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *