Thursday , April 23 2026
Breaking News

ऊसाची थकबाकी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत मुदत

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत बिले अदा करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत.

आज बुधवारी (१९ जून) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांच्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

जिल्ह्यात एकूण २८ साखर कारखाने असून त्यापैकी ३ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या बिलांची थकबाकी आहे. साखर कारखानदारांनी २५ जूनपर्यंत १५ टक्के व्याजासह थकबाकी भरायची आहे.

विहित मुदतीत थकबाकी न भरणाऱ्या साखर कारखान्यांची गाळे जप्त करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून, साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत थकीत रक्कम व्याजासह अदा करण्यात येईल, असे कव्हर लेटर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

२५ जूनपर्यंत शेतकऱ्यांची थकीत रक्कम न भरल्यास जप्त केलेल्या साखर कारखान्यांतील साखरेचा साठा व साहित्याचा लिलाव करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी साखर कारखान्यांना सांगितले.

जिल्ह्यातील कारखान्यांकडील थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह मोजून अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला माजी मंत्री शशिकांत नाईक, अन्न विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांच्यासह शेतकरी नेते व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या परीक्षेत अथणीची प्रार्थना बिरादार राज्यात प्रथम

Spread the love  बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *