Monday , September 21 2026
Breaking News

प्रेम विवाह नाकारल्याच्या रागातून दोघांची हत्या

Spread the love

 

निपाणी : प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची व तिच्या भावाची हत्या केल्याची घटना निपाणी तालुक्यातील अकोळ गावात घडली. मंगला नाईक (45) आणि प्रज्वल नाईक (18) अशी हत्या झालेल्याची नावे आहेत. निपाणी तालुक्यातील अकोळ गावातील एका घरात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने लोक हादरून गेले.

रवीने हा गुन्हा केल्याची माहिती आहे. त्याचे एका तरुणीवर प्रेम होते. पण त्याच्या घरच्यांचा त्याच्या प्रेमाला खूप विरोध होता. लग्नाला कोणत्याही कारणास्तव संमती न मिळाल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे

या घटनेसंदर्भात आरोपी रवी आणि खून झालेल्या मंगला यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, निपाणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *