Monday , April 20 2026
Breaking News

मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी

Spread the love

 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे म. ए. समितीची मागणी

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी आणि मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा तसेच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगाव व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे.
खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांच्यासह बेळगाव येथील समितीच्या कार्यकर्त्यांनी गोवा येथे नुकतीच केंद्रीय मंत्री नाईक यांची भेट घेतली. यावेळी आबासाहेब दळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि प्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. तसेच संमेलनाला बेळगाव सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यावेळी उमेश पाटील, सुहास हुद्दार, किरण हुद्दार, शेखर तलवार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बेकवाडच्या कलमेश्वर मंदिरात शिवलिंगावर अर्ध नटेश्वर सूर्यकिरणांचे दर्शन

Spread the love  बेळगाव : खानापूर तालुक्यातील बेकवाड (ता. खानापूर) येथील प्राचीन कलमेश्वर मंदिरात अक्षय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *