Sunday , July 26 2026
Breaking News

४२ वर्षांनंतर भरणार कंग्राळी बुद्रुकची महालक्ष्मी यात्रा

Spread the love

 

बेळगाव : ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रा आणि भंडारा उत्सवाच्या परंपरेचा पुनर्जन्म करत, बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक गावाने १९८४ नंतर एप्रिल २०२६ मध्ये भव्य महालक्ष्मी यात्रा आयोजित करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या एकमताने घेतला आहे. आज लक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून यात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली, तर भंडारा उत्सवात गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग दाखवून परंपरेचा गौरव साजरा केला.

चार दशकानंतर, ग्रामस्थ, देवकी पंच, आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वमताने ही धार्मिक-सांस्कृतिक परंपरा पुन्हा सजिवी करण्याचा निर्णय घेण्यात आला. “गावाच्या ऐक्याचा हा प्रतीक आहे. यात्रेमुळे पिढ्यान्पिढ्यांचा सांस्कृतिक ओलावा टिकून राहील,” असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. यात्रेच्या तयारीतून गावातील एकात्मता आणि उत्साह स्पष्टपणे दिसून आला. लक्ष्मी मंदिरात सकाळी वैदिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर, ग्रामस्थांनी भंडारा उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग दाखवला. गावातील बंधू-भगिनींनी एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांतर्गत उत्सवाला गंमतचे स्वरूप दिले. “१९८४ च्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. २०२६ च्या यात्रेसाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *