कोगनोळीत प्रचार सभा कोगनोळी : बेळगाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एकजुटीमुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणूनच आपण या निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी युवा उमेदवार असून त्यांनी कोरोना काळात व पूरग्रस्त काळात जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत. येणार्या या विधान परिषद निवडणुकीत पहिल्या …
Read More »लाळखुराक आजाराने कुर्लीतील तीन जनावरे दगावली
लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …
Read More »शेतकर्यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी
चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …
Read More »काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …
Read More »…तर शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद; शिक्षण मंत्र्यांची माहिती
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही बंगळूर : राज्यातील विशेषत: शाळा, महाविद्यालयातील कोविड सकारात्मक प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर आवश्यक वाटल्यास, कर्नाटक सरकार शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले. सोमवारी, (ता. 6) …
Read More »राज्यातल्या भाजप सरकारामुळे खानापूर तालुक्याचा विकास खुंटला
आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका निसर्ग प्रधान तालुका आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कुचकामी ठरले आहे. पहिल्यांदाच खानापूर तालुक्यात काँग्रेसच्या आमदारांनी 800 कोटी रूपयाचा निधी आणला असला तरी राज्यातील भाजप सरकार विकासाच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली …
Read More »क्रांतीसाठी समाजव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आवश्यक : प्रा. डॉ. अच्युत माने
समता सैनिक दलातर्फे अभिवादन निपाणी : निपाणी परिसर हा क्रांतिकारकांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. अजूनही काही प्रमाणात दलित, शोषित, पीडित आणि शेतकर्यांवर अन्याय सुरुच आहे. त्यामुळे समाजात बदल करण्यासाठी तरुणांची फौज आवश्यक आहे. सामान्य माणूस हाच क्रांतीचा आधार आहे. 70 वर्षानंतर हे अपेक्षित स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यामुळे दुसर्या स्वातंत्र्याची गरज …
Read More »विधानपरिषद निवडणूक सुरळीत पार पाडा
मोहन भस्मे : निपाणी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम निपाणी : शुक्रवारी (ता. 10) होणार्या विधान परिषद निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. येथील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी कॉलेजमध्ये आयोजित पीआरओ व एपीआरओ निवडणूक कर्मचार्यांना प्रशिक्षण देताना ते बोलत होते. प्रारंभी …
Read More »दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!
कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta