Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

जलवाहिनी फुटल्यामुळे वीरभद्र नगर येथे हजारो लिटर पाणी वाया

बेळगाव : स्मार्ट सिटी बेळगाव शहरातील जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. वीरभद्रनगर येथील जलवाहिनीला गळती लागल्याने कारंज्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. मात्र सध्या ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई करताना जलवाहिन्यांचे नुकसान …

Read More »

बेळगावात पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन : प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील

संमेलनाचे उद्घाटक खासदार संजयजी राऊत बेळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे बेळगावमध्ये दरवर्षी होणारे साहित्य संमेलन यात खंड पडू नये म्हणून तंत्रज्ञानाची जोड घेऊन बेळगाव सीमाभागातील हे पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन दोन सत्रात घेवून मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी व नवोदित कवींना व्यासपिठ म्हणून आयोजन केले आहे, असे मत सीमाकवी रवींद्र पाटील …

Read More »

माळी गल्लीत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिकारक लसीकरण शिबिर

बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ आणि शिवाई देवी महिला मंडळ, माळी गल्ली- बेळगाव यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिबिराला चालना दिली. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक …

Read More »

समर्थ नगर येथे चिकनगुणिया, डेंग्यू प्रतिबंधक लस

बेळगाव : श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव तसेच कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत चिकनगुणिया, डेंग्यू या रोगावर होमोपथीक प्रतिबंधक लस देण्यात आले १२०० हुन अधिक जणांनी याचा लाभ घेतला. यावेळी कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर …

Read More »

बेकी टाळावी एकी करावी!

युवा कार्यकर्त्यांची आर्त हाक खानापूर : तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी सध्या सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तसेच मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. सध्या खानापूर तालुक्यात माजी आमदार दिगंबर पाटील गट, माजी आमदार अरविंद पाटील गट …

Read More »

अन पिंपळाने घेतला मोकळा श्वास

शेरी गल्ली कोपऱ्यात देवतांच्या भग्न प्रतिमा, कचरा केला संग्रहित बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असूनही रहिवासी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कचराकुंड बनलेल्या पिंपळाच्या पाराने आज मोकळा श्वास घेतला. सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेरी गल्लीच्या कोपऱ्यातील पिंपळाच्या झाडाखाली टाकण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन आणि कचरा हटवण्यात आला.रविवारी सकाळी फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Read More »

बेळगावच्या बेलकोर इंडस्ट्रीजचे युवा उद्योजक कर्नाटक सरकारकडून सन्मानित

बंगळूर : १५ जुलै २०२१ हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कर्नाटक सरकार, सिडोक (CEDOK) यांच्या सहयोगाने कर्नाटकातील यशस्वी युवा उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.बेलगाव येथील पेपर पैकेजिंग बॉक्स तयार करण्यात गुंतलेल्या स्टार्टअप बेलकोर इंडस्ट्रीजला कर्नाटकातील 60 इतर …

Read More »

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन

बेळगाव (प्रतिनिधी) : राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी मार्गसूचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठात व्हाईस चान्सलर प्रो. एम. रामचंद्र गौडा व रजिस्ट्रार प्रो. बसवराज पद्मशाली यांच्या …

Read More »

येडियुराप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा 1.5 कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन

बेंगळूर : कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेतली आहे. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही सहभागी झाले होते. यावेळी येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदींकडे महिन्याला 1.5 …

Read More »

बारावीचा 20 जुलैला निकाल

बंगळूर : कोरोना संसर्गामुळे रद्द झालेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी राहीर करण्यात येणार आहे. पदवीपूर्व परीक्षामंडळाने निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे. पीयूसी बोर्डाच्या संचालिका स्नेहल यांनी 20 जुलै रोजी बारावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल असे सांगितले. निकाल 20 जुलै रोजी विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला …

Read More »