खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी व मणतुर्गा गावची प्रियांका पुंडलिक देवलतकर हिने दहावीच्या परीक्षेत ६१७ मार्क (९८.७२) घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला. त्यामुळे मणतुर्गा गावाचे नाव तालुक्यात प्रसिध्द केले. म्हणून भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »खानापूर युवा समितीचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगार प्रमुखांना निवेदन
खानापूर : गेल्या काही दिवसापासून सातत्याने खाद्यपदार्थांच्या व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने महागाईचा भस्मासुर सामान्य जनतेच्या समोर आ वासून उभारला आहे, यासाठी सामान्य जनतेचे हाल होत असल्याने ही महागाई केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दखल घेऊन महागाई दर कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, जरी गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने …
Read More »खानापूर युवा समितीचे उद्या विविध विषयांवर तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगारप्रमुखांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमि करणे, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोमवारी तहसीलदाराना निवेदन दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाद्य पदार्थांच्या …
Read More »ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी तालुक्यात दहावीच्या मराठी विभागातून प्रथम व व्दितीय
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थीनी कुमारी संजना नारायण घाडी हिने मराठी विभागातून 621 गुण (99.36) तालुक्यात प्रथम तर कु. अर्चना एन. पाटील हिने 608 गुण घेऊन व्दितीय आली आहे. कन्नड माध्यमची विद्यार्थीनी कु. प्रियांका पी. देवलतकर हिने 617 गुण …
Read More »वादळी पावसाने निलावडे परिसरीतील शेतकऱ्याच्या वायंगण भात पिकाचे प्रचंड नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे, मुघवडे, कबनाळीसह अनेक भागात उन्हाळी पिक म्हणून वायंगण भात पिकाचे उत्पन्न शेतकरी घेतात. नुकताच झालेल्या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला. याची पाहणी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म : मंजुनाथ स्वामी
खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि …
Read More »खानापूर तालुका समितीच्या एकीत खोडा घालणारे हे कोण?
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मध्यंतरी ऐक्याचे वारे वाहू लागले होते. त्याचे समितीप्रेमी नागरिकांनी स्वागतही केले. पण हे ऐक्य अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. अशातच तालुका समितीच्या कार्यकारिणी निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वेळच्या 2018 मधील …
Read More »क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने उद्या खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम
बेळगाव : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे उद्या गुरुवार दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता अ. भा. क्षत्रिय मराठा समाजाचे धर्मगुरू प.पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाटील गार्डन करंबळ क्रास खानापूर येथे सदर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी उद्या …
Read More »गस्टोळी कॅनलचा पाणी पुरवठा त्वरीत करावा
भरमानी पाटील यांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्वात जुना गस्टोळी कॅनल तुटून गेल्याने सहा महिन्यापासुन गस्टोळी परिसरातील विजयनगर, गस्टोळी, गस्टोळी दट्टी, भुरूनकी, चिंचवाड, मास्केनट्टी, करकट्टी आदीसह अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला. याला वाचता फोडण्यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी गस्टोळी कॅनलची समस्या …
Read More »सिंगीनकोप शाळेत शाळा प्रारंभोत्सव उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्वप्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रारंभोत्सव सोमवारी दि. 16 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन गावातून प्रभात फेरी काढून शाळा प्रारंभोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta