Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर

खानापूर स्टेट बँकेबाबत ग्राहकातून नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या माहामारीत जनतेला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते आहे. असे असताना खानापूर स्टेट बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून बॅंक व्यवहारासाठी पास बुकावर बारकोडची सक्ती केल्याने अनेक ग्राहकांच्या पास बुकावर बारकोड नाही. अशाना स्टेट बँकेला दोन महिन्यापासून हेलपाटे मारावे लागत आहे.मात्र याची दखल स्टेट बँकेच्या व्यवस्थापकानी घेतली …

Read More »

दुर्गम भागात हेल्प फॉर निडीची मदत

खानापूर : बेळगावपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला धनगरवाडा या वाड्यात 22 ते 25 घरे आहेत. कोरोनामुळे या गावातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. गेल्या कोरोना काळातही या ठिकाणी सुरेंद्र अनगोळकर यांनी धान्याचे वाटप केले होते आणि आताही या ठिकाणी लहान मुलांसाठी बिस्किटे, पोहे, रवा व धान्य …

Read More »

महालक्ष्मी कोविड सेंटरवतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी पार पडला.यावेळी स्वागताध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी स्वागत केले. तर अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंगेशजी भिंडे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारत माता …

Read More »

निरंजन देसाई यांच्याकडून खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन देसाई यांनी खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत.मंगळवारी शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरदेसाई यांनी तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळ देसाई यांच्याकडे पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी खानापूर तालुक्यात युवा समिती व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना …

Read More »

तालुक्यात कोरोना काळात मिरची पिकाचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात खानापूर तालुक्यातील बिडी सर्कलमधील झुंजवाड के जी गावातील सर्वे नंबर १४६ /४ मधील शेतकरी कौशल्या बाळेकुंद्री यांच्या शेतातील मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.मिरचीची लागवड केल्यापासुन कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकही बंद झाली. त्यात हातातोंडाशी आलेली मिरची पिक काढणे शक्य झाले नाही. लाखो रूपये …

Read More »

महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला महांतेश कवटगीमठांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी अचानक खानापूर तालुक्याच्या भेटीवर आलेल्या एमएलसी व मुख्यमंत्री सचेत महांतेश कवटगीमठांनी शांतिनिकेतन स्कूलमध्ये आयोजित केलेल्या व महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती समितीच्यावतीने व श्रीमहालक्ष्मी ग्रुप, राष्ट्रीय संघ, व जनकल्याण ट्रस्ट यांच्यावतीने सुरू केलेल्या महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट दिली.यावेळी कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी पुष्पगुच्छ …

Read More »

बेकवाड येथे मोफत लसीकरण

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायत व्याप्तीतील बेकवाड, हाडलगा, खेरवाड, बंकी, बसरीकट्टी गावातील सुमारे दीडशे नागरिकांनी मोफत लसीचा लाभ घेतला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव, पंचायत विस्तिर्ण अधिकारी नागप्पा बन्नी, बिडी प्राथमिक आरोग्य खात्याचे कर्मचारी सुदर्शन, पंचायत सदस्य, बेकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणारे मंजुळा चिकोर्डे, अंगणवाडी सेविका वंदना …

Read More »

नंदगड तलावाची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी खानापूर : पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदगड (ता. खानापूर) येथील तलावाची युद्धपातळीवर डागडुजी केली जावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी खानापूर तालुक्याच्या लघु पाटबंधारे विभागाचे खानापूर …

Read More »

गर्लगुंजीत २०० नागरिकांना मोफत लसीकरणाचा लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील २००हुन अधिक नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घेतला.येथील मराठी मुलीच्या शाळेत ४५ वर्षावरील नागरिकाना मोफत लसीकरण कार्यक्रम सोमवारी दि. २१ रोजी पार पडला.यावेळी गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.लसीकरणाचा शुभारंभ कार्यक्रमावेळी पीडीओ जी. एल. कामकर यांनी …

Read More »

आंतरराष्ट्रीय योगादिन खानापूरात साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिन खानापूर येथील मांगरीष हाॅलमध्ये सोमवारी दि. २१ जून रोजी पतांजली योग संघाच्यावतीने साजरा करण्यात आला.यावेळी कोरोनाच्या माहामारीत योगासने हा राम बाण उपाय आहे. नियमित योगासने केली तर आरोग्य चांगले राहते. मन ताजेतवाने होते. शारीरिक, मानसिक विकासासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले …

Read More »