खानापूर : कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या दगडी पूलाची ग्रामस्थांनी श्रमदानातून आज डागडूजी केली. सदर पूलाला भगदाड पडले होते व वाहतुक करणे धोक्याचे ठरत होते. कुप्पटगिरी रस्त्यावरील हा पूल उंचीला कमी असल्याने दर वर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत जाते व त्याकाळात पूलावरून रहदारी बंद होते. तशात हा पूल …
Read More »डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि …
Read More »ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार करा : खानापूर तालुका समितीची हेस्कॉमकडे मागणी
खानापूर : ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात तसेच हलशी येथील सब स्टेशन लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हेस्कॉमकडे करण्यात आली आहे. खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यानी गुरुवारी खानापूरचे नूतन सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष …
Read More »कस्तुरीरंगन अहवालाबाबत खानापूरच्या आमदारांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी; खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन
खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावांच्या स्थलांतरासंदर्भात काढलेल्या आदेशावर विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. बैठकीचे प्रास्ताविक आणि स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. प्रारंभी बेळगाव तालुका समिती …
Read More »सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे
शाळा सुधारणा समितीची खानापूर येथे बैठक खानापूर : सर्व सरकारी शाळा व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. राजकारण बाजूला ठेवून शाळेसाठी सतत प्रयत्न केल्यास सरकारी शाळा वाचविण्यात निश्चितच यश मिळेल, असे मत गंगाधर गुरव यांनी व्यक्त केले. ‘सरकारी शाळा वाचवा’ अभियानाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील शाळा …
Read More »खानापूर जंगलवासीयांनी मान्य केल्यास त्यांचे अन्यत्र स्थलांतर करू : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
खानापूर : खानापूर वनभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्यास त्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्र्यांशी आधीच बोलले आहेत. शेकडो वर्षांपासून तेथे लोक राहतात, वनविभागाच्या कायद्यानुसार गावकऱ्यांनी सहमती दर्शवली तर ते कुटुंबाला 15 …
Read More »खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केली पाहणी
खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच खानापूर तहसीलदार यांनी आज खानापूर तालुक्यात पावसामुळे पडलेल्या घरांचा पहाणी दौरा केला. खानापूर तालुक्यात पावसामुळे एकूण 201 घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी 39 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असल्याचे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकार हे …
Read More »अतिवृष्टीमुळे खानापूर, बेळगाव ग्रामीण व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर
खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे. खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार …
Read More »गावे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी
खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने …
Read More »मराठा मंडळ कॉलेजजवळ असलेल्या दुभाजकाला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू
खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta