Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री पूल पाण्याखाली

  खानापूर : खानापूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर-हेमाडगा मार्गावरील मनतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर जवळजवळ पाच फूट पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे वाहनधारक व प्रवासी वर्ग पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर करीत आहेत. काल दिवसभर व संपूर्ण रात्रभर …

Read More »

संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाच्या पायी दिंडीचे मणतुर्गा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत…

  खानापूर : आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत हजारो वारकरी सहभागी होण्यासाठी जात असतात. संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाचे वारकरी दक्षिण गोवा ते पंढरपूर पर्यंत पायी दिंडी जाणार आहेत. दिंडीची सुरुवात दक्षिण गोव्यातून करून बाली, सावर्डे, धडे, मोलम, अनमोड, अखेती, मेरडा आदी मार्गाने येऊन मणतुर्गा येथे आज सायंकाळी आगमन …

Read More »

बेळगाव आणि खानापुरात उद्या शाळांना सुट्टी

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर परिसरात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व कॉलेजला उद्या बुधवार दि. 25 जून रोजी असणार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.

Read More »

काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव: सत्ताधारी काँग्रेसमध्ये असंतोष वाढत असल्याने राजू कागे यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सांगितले. बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार पडण्याची वेळ जवळ येत आहे. मुख्यमंत्री बदलतील की नाही हे माहित नाही. …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर

  राष्ट्रपती, पंतप्रधानांसह काँग्रेस हायकमांडच्या भेटीचे नियोजन बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या संध्याकाळी दिल्लीला जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटण्याचा त्यांचा मानस आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडलाही भेटून राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती देतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्य आणि भाजपच्या …

Read More »

राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये वाढता असंतोष

  सरकारसमोर पेच; असमाधान व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्या वाढतीच बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. सत्ताधारी पक्षातील एकामागून एक एक आमदार सरकारविरुद्ध विधाने करत आहे, ज्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून सरकारी पातळीवर सर्व काही ठीक नाही, कॉंग्रेस पक्षात असंतोष वाढत असल्याचे …

Read More »

नवीन जात सर्वेक्षणात शिक्षक सहभागी होणार नाहीत

  मंत्री मधू बंगारप्पा; सर्वेक्षण आउटसोर्स केले जाणार बंगळूर : सरकारी शाळेतील शिक्षकांच्या सेवा वापरण्याऐवजी नवीन जात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी खासगी एजन्सीला देण्याची योजना आहे, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी सरकारला आधीच स्पष्ट केले आहे की जर सर्वेक्षणाच्या …

Read More »

लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य…

  लोंढा : बेळगाव-पणजी महामार्गावर लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत 300 मीटर लांब रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे किरकोळ अपघात सामान्य व ग्रामस्थांना तातडीने दुरूस्ती करावी लोंढा गावाला लोंढा जंक्शन असे म्हटले जाते, कारण गोव्याला जाणारे बहुतेक प्रवासी हाच मार्ग वापरतात. महामार्ग …

Read More »

खानापूरमध्ये इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन…

  खानापूर : खानापूर येथील बहुप्रतीक्षित इंदिरा कॅन्टीनचे आज उद्घाटन झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः लोकांना नाश्ता वाढून या कॅन्टीनचे उद्घाटन केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे इंदिरा कॅन्टीन, माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात …

Read More »

मोदी सरकारने आरोग्य समस्या ‘समग्र’ दृष्टिकोनातून सोडवल्या अमित शहा; आदिचुंचनगिरी विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन

  बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठीच्या समग्र दृष्टिकोनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.२०) कौतुक केले. आदिचुंचनगिरी विद्यापीठ (एसीयु) बंगळूर कॅम्पसचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. “आपले नेते आणि पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये म्हटले होते की गरिबीचा सर्वात मोठा …

Read More »