Tuesday , March 3 2026
Breaking News

कर्नाटक

श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे निपाणी तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि त्यासाठी धारातीर्थ पडलेले मावळे, गडकोट, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अजरामर रहावा, त्याची माहिती युवा पिढीला मिळावी, त्या उद्देशाने ‌ येथील श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे सलग ७ व्या वर्षी तालुका स्तरीय दुर्गबांधणी (किल्ला) स्पर्धेचे …

Read More »

बोरगाव श्री अरिहंत दूध उत्पादक संघातर्फे दिवाळीनिमित्त विक्रमी लाभांशाचे वाटप

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यंदा विक्रमी लाभांशाचे वाटप करण्यात आले. म्हैस दूध उत्पादकांना ४.५% व गाय दूध उत्पादकांना ३.६०% प्रमाणे दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर व मान्यवरांच्या हस्ते सदरचे लाभांश देण्यात आले संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी, संघाचे संचालक …

Read More »

खानापूर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी गुंतले जमीन बळकावण्याच्या मागे

  खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात अनागोंदी कारभार चालला असून तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोरब येथील 164 एकर जागा बळकविण्याचा काही भूमाफियांचा प्रयत्न असल्याचा संशय खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसला आहे. मोरब येथील सर्वे नंबर 21 व 22 येथील जागा अनाधिकृत रित्या बळकाविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असून त्यामध्ये तहसीलदार …

Read More »

जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, खवणेवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

  दड्डी : जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खवनेवाडी ता – हुक्केरी जि – बेळगांव येथे भव्य 58 किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन खास दीपावली निमित्त शनिवार दि. १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजता आयोजित केली आहे. तरी हौशी महाराष्ट्र – कर्नाटक कबड्डी प्रेमींनी याचा लाभ घ्यावा …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश; इटगी गावातील ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या मार्गी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ४२ शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक समस्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी अखेर सोडवली आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच इटगी गावचे ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि ग्रामस्थांनी शाळेच्या मागणीसाठी गाव बंद ठेवून आंदोलन केले …

Read More »

शेततळ्यात पडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; विजापूर येथील घटना

  विजापूर : शेततळ्यात पाय घसरून पडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. एका मुलासह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची ही दुर्घटना विजापूर तालुक्यातील मिंचनाळ तांडा येथील मादेव नगरात घडली आहे. शिवम्मा राजू राठोड (८), कार्तिक विश्वा राठोड (७) आणि स्वप्ना राजू राठोड (१२) अशी मृत पावलेल्या मुलांची …

Read More »

तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविल्याबद्दल नगारजीचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका इंग्लिश माध्यम शाळेतील युकेजीमधील विद्यार्थी तैमुर फैय्याज नगारजी यांने बेंगळुरू येथील कोरमंडलम इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील जी ४ या खेळामध्ये प्रथम क्रमांक आणि कुंफूमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल फटकाविले आहे. त्याला प्रशिक्षक उत्तम सूर्यवंशी, कौस्तुभ जाधव,ऋषिकेश भोसले यांचे मार्गदर्शन …

Read More »

गरजेच्या ठिकाणी अंधार, नको तिथे पथदिपाचा उजेड

  निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, वरदविनायकनगर कमलनगर येथील नागरी वस्तीमध्ये गेल्या दोन वर्षापासून पथदीप व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या उच्चभ्रू परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी चाचपडत ये -जा करावी लागत आहे. तर आवश्यक नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून पथदीप बसविले आहेत. नगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत …

Read More »

अंजली निंबाळकर यांनी घेतला उत्तराखंडमधील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा आढावा

  खानापूर : माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला. यावरी डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या अखत्यारीतील उत्तराखंड राज्याच्या ‘संघटन सृजन अभियान’ या उपक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. या आढाव्यात त्यांनी आपल्या कामाचा …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »