Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; टाक्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे

  खानापूर : खानापूर नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठा टाक्यांची स्वच्छता तसेच आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवार, दि. 2 जुलै ते सोमवार, दि. 6 जुलै 2026 या कालावधीत शहरातील नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी दिली. या कालावधीत नागरिकांनी पिण्यासाठी …

Read More »

शैक्षणिक वर्षाचा महिना उलटला; ९ हजार शिक्षक भरतीचा अजूनही पत्ता नाही

  बेंगळूरू : नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी राज्यातील ९ हजार शिक्षक भरती प्रक्रियेला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने ९ हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन महिना उलटूनही भरतीसंदर्भात कोणतीही ठोस हालचाल दिसून …

Read More »

दड्डी भागात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

  दड्डी : दड्डी परिसरात वटपौर्णिमा हा सण सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सलामवाडीसह परिसरातील विविध गावांतील विवाहित महिलांनी पहाटेपासून वडाच्या झाडाजवळ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिलांनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून व्रताचे विधी पार पाडले. यावेळी महिलांनी …

Read More »

सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

  बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; मुसळधार पावसामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी (29 जून) अखेर शोधून बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली होती. अखेर बेळगावच्या …

Read More »

कर्नाटकात गुटखा-पानमसाल्यावर लवकरच बंदीचे संकेत : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

  बंगळूर : कर्नाटक राज्यात पानमसाला आणि गुटख्यावर आगामी काही दिवसांत कठोर निर्बंध अथवा पूर्ण बंदी लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहेत. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपलब्ध अहवालांनुसार पानमसाला आणि गुटखा उत्पादनांमध्ये अमली पदार्थांचे घटक आढळले आहेत. त्यामुळे …

Read More »

बेनाडी -पंढरपूर दिंडीचे १८ आयोजन; पायी दिंडीचे १६ जुलैला आयोजन

    निपाणी (वार्ता) : बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी १८ व्या वर्षी गुरुवारी (ता.१६) रवाना होणार आहे. त्याची तयारी पूर्णत्वाकडे आले असून वारकरी आणि भाविकांमध्ये दिंडीची आस लागून राहिली आहे. गुरुवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता शरद जोशी यांच्या पौरोहित्याखाली माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पोवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा …

Read More »

कर्नाटकमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्यांची संख्या १३,६७५; बेळगाव जिल्ह्यात ४५८ जण आढळले

  बंगळूर : कर्नाटकात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाच्या जिल्हानिहाय पाहणीत समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात एकूण १३,६७५ जण अवैधरीत्या राहत असल्याचे आढळून आले असून, बेळगाव जिल्ह्यात अशा ४५८ जणांची नोंद झाली आहे. गृह विभागाने केलेल्या प्राथमिक पडताळणीत सर्वाधिक १०,६५० अवैध स्थलांतरित …

Read More »

सुरल (सुर्ल) धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू; शोधमोहीम पुन्हा सुरू

  खानापूर : गोवा राज्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २८) घडली. बुडालेल्या तरुणाचे नाव आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे असून तो मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा …

Read More »

पुण्यातील यशस्वी उद्योजक शिवानंद चन्नेवाडकर यांचा खानापूर तालुक्यातील तरुणांना आदर्शपाठ

  माता-पित्यांच्या स्मरणार्थ गर्बेनहट्टीतील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे वाटप खानापूर : आजच्या काळात जेव्हा राजकारणी मंडळी निवडणूक, पद, प्रतिष्ठा आणि मानपान डोक्यात ठेवून तात्पुरते, दिखाऊ सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात, अशा काळात कोणतीही प्रसिद्धीची हाव न ठेवता, केवळ आपल्या जन्मभूमीप्रती असलेली कृतज्ञता आणि आई-वडिलांचे संस्कार जपणारी माणसे विरळीच असतात. पुण्यातील …

Read More »

शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे

  सबलेफ्टनंट सुयश नुल्ले; कुर्ली हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतात. योग्य मार्गदर्शन व अभ्यास नियोजन नसल्यामुळे बरेच विद्यार्थी अयशस्वी होतात. यासाठी त्यांना शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांबाबत आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत नाणीबाई चिखली येथील सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त …

Read More »