Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार

  खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व हार देऊन सन्मानित केले. यावेळी तालुक्यात आरोग्य …

Read More »

स्व. मारुती दळवी : कर्तृत्व, संस्कार आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास

  “गेलात आम्हा सोडून, राहिल्या मागे आठवणी… आठवणी मनी, स्मरणी; मार्गक्रमू या जीवनी…” माणूस जातो, पण त्याचे विचार, संस्कार, कर्तृत्व आणि माणुसकीची ऊब कायम स्मरणात राहते. आमच्या दळवी कुटुंबाचा भक्कम आधारवड, मणतुर्गे पंचक्रोशीतील सर्वपरिचित व आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि माझे लाडके काका, स्वर्गीय मारुती नारायणराव दळवी यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने आमच्या …

Read More »

खानापूरातील धबधबे, जंगल परिसर पर्यटकांसाठी तात्पुरते बंद; वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका आणि पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे, नदी-नाले आणि जंगल परिसर अत्यंत धोकादायक बनले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वन विभागाने खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख धबधबे आणि वनक्षेत्रांमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी लागू केली आहे. बेळगावचे उपअरण्यसंरक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती …

Read More »

शाहूनगरमधील समस्या न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा

  पाणीटंचाई, पथदिप, अस्वच्छतेबाबत बाबत नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी उपनगरातील शाहूनगर व आश्रयनगर परिसरात पाणीटंचाई, बंद पथदिप आणि अस्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत नागरिकांनी देऊन आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात …

Read More »

बोरगाव येथील अरिहंत सभागृहात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘सहकार सप्ताह’‌साजरा करण्यात येणार आहे. सहकार विभाग, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बेळगांव, विविदोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ बोरगांव, श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; बोरगांव (मल्टी-स्टेट) अरिहंत हॉस्पिटल, बेळगांव, लट्ठे शैक्षणिक संस्था, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक …

Read More »

गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा गावाजवळ चिखलात बस अडकली; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

  खानापूर : बेळगाव – गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा (ता. खानापूर) गावाजवळ गुरुवारी सकाळी एनडब्ल्यूकेआरटीसीची बस चिखलात अडकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुसळधार पावसामुळे वरकडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून रस्त्याची दयनीय …

Read More »

बंगळूरच्या दगड खाणीत भीषण दुर्घटना; दरड कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

  बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे गुरुवारी पहाटे दगड खाणीत भीषण दुर्घटना घडली. बंगळूर दक्षिण तालुक्यातील मदापटना परिसरातील एका दगड खाणीत अचानक दरड कोसळल्याने ९ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. …

Read More »

अरिहंत संस्थेने उंचावले सर्वसामान्यांचे जीवन

  सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणी शाखेचा २३ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजकांना केंद्रबिंदू म्हणून बोरगाव येथे दिवंगत रावसाहेब पाटील यांनी अरिहंत को-ऑप संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून पत पुरवठा करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. सध्या संस्थेच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध शाखाद्वारे कार्य सुरू आहे. …

Read More »

बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; लॉरीची धडक लागून आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

  हुबळी : धावत्या बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा बाजूने जाणाऱ्या लॉरीला धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली. मृत विद्यार्थ्याची ओळख फक्कीरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय १७, रा. शिरूर) अशी झाली असून, तो आयटीआयचे शिक्षण घेत …

Read More »

स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांचीच; कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

  बेंगळुरू : शाळेत विद्यार्थी ज्या प्रकारे सुरक्षित असतो, त्याचप्रमाणे घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासादरम्यानही त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे ही शाळेचीच कायदेशीर जबाबदारी आहे. स्कूल बस ही शाळेच्या शैक्षणिक व्यवस्थेचाच अविभाज्य भाग असून या जबाबदारीतून कोणतीही शाळा स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण …

Read More »