खानापूर : गोवा राज्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २८) घडली. बुडालेल्या तरुणाचे नाव आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे असून तो मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा …
Read More »पुण्यातील यशस्वी उद्योजक शिवानंद चन्नेवाडकर यांचा खानापूर तालुक्यातील तरुणांना आदर्शपाठ
माता-पित्यांच्या स्मरणार्थ गर्बेनहट्टीतील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे वाटप खानापूर : आजच्या काळात जेव्हा राजकारणी मंडळी निवडणूक, पद, प्रतिष्ठा आणि मानपान डोक्यात ठेवून तात्पुरते, दिखाऊ सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात, अशा काळात कोणतीही प्रसिद्धीची हाव न ठेवता, केवळ आपल्या जन्मभूमीप्रती असलेली कृतज्ञता आणि आई-वडिलांचे संस्कार जपणारी माणसे विरळीच असतात. पुण्यातील …
Read More »शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे
सबलेफ्टनंट सुयश नुल्ले; कुर्ली हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतात. योग्य मार्गदर्शन व अभ्यास नियोजन नसल्यामुळे बरेच विद्यार्थी अयशस्वी होतात. यासाठी त्यांना शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांबाबत आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत नाणीबाई चिखली येथील सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त …
Read More »मोहरम, शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपणातून सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश
निपाणी (वार्ता) : धर्म, जात, पंथ आणि विचारांच्या सीमा ओलांडून जेव्हा समाज एकत्र येतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा संकल्प करतो. तेव्हा अशा उपक्रमातून समाजपरिवर्तनाची नवी दिशा निर्माण होते. याच भावनेतून मोहरम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने नेसरीकर प्लॉट येथे “भूमी वात्सल्य फाउंडेशन”तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे …
Read More »निपाणीतील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक सोहळा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी (ता.२७) तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण, माजी सभापती किरण कोकरे शामराव पुंडे यांच्या हस्ते छत्रपती महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष …
Read More »‘या हुसेन, या हुसेन’च्या जयघोषात निपाणी परिसरात मोहरम सण साजरा
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी शहरातील विविध भागामध्ये ताबूत मिरवणूक काढून नेहरू चौक, निपाणकर राजवाडा येथे मोहरम सणाची सांगता करण्यात आली. श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर राजवाड्यमध्ये मोहरम सणाची सुरुवात झाली. निपाणी संस्थांनाचे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी …
Read More »शनिवारच्या शाळेच्या वेळेत मोठा बदल; आता सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंतच वर्ग
बेळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने शाळांच्या शनिवारच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी शाळा सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेतच भरविण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी शाळांच्या वेळेत मोठी तफावत होती. काही शाळा सकाळी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील शिवराज विद्यासंकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे उपस्थित होते. यावेळी ‘स्वयंभू यशवंतराव घाटगे: संस्थानिक शाहू महाराज झाले …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये येथील अग्निशामक दलातर्फे अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. आणीबाणीच्या प्रसंगी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि सुरक्षित बाहेर पडण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे होत्या. प्रारंभी आगीची कारणे, धोके आणि प्रतिबंध …
Read More »मंत्रालयाकडे निघालेल्या ओम्नी कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
कोप्पळ : कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील कुकनूर तालुक्यात भानापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात मंत्रालयाकडे निघालेल्या ओम्नी कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या अशोक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta