Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

गर्लगुंजी माऊली देवी यात्रा काळात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

  विद्यार्थी व कामगारांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा खानापूर : गर्लगुंजी येथील श्री माऊली देवी यात्रा काळात तसेच यात्रेनंतरही बेळगाव–गर्लगुंजी आणि खानापूर–गर्लगुंजी या मार्गांवरील बसफेऱ्या वाढवाव्यात व सुरू असलेल्या बससेवा सुरळीत ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बेळगाव–गर्लगुंजी व खानापूर–गर्लगुंजी मार्गांवर बससेवेमध्ये अनियमितता निर्माण …

Read More »

ध्येय, परिश्रम, जिद्दीमुळे विद्यार्थ्यांचे यश

  अण्णासाहेब हवले; गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यासागर संस्थेच्यावतीने सत्कार निपाणी (वार्ता) : वर्षभर निरंतरपणे अभ्यास केल्याने यश मिळते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. ध्येय चिकाटी ठेवून अभ्यास केल्यास निश्चितच आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी निरंतर पाणी अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळवावे. त्यामुळे समाज गाव आणि शिक्षण संस्थेचे …

Read More »

ई-केवायसी करण्यासाठी ज्येष्ठांना त्रास; गॅस सिलिंडरसाठी निपाणीत वाढला संघर्ष

  निपाणी (वार्ता) : घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या सूचनांवर आधारित अंमलबजावणी होत असल्याने विशेष करुन ज्येष्ठांची गैरसोय अधिकच वाढली आहे. गॅस सिलिंडर एजन्सींमध्ये सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रथम ई-केवायसी पूर्ण करण्याचे सांगितले जात आहे. कागदपत्रांची पूर्तता, …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी राजा शिव छत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक 11 वाजता बोलवण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

गणेश मंडळ देसाईवाडा (तिओली) ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान

  खानापूर : शुक्रवार दिनांक 24 रोजी तिओली (देसाई वाडा) येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गणेश मंडळ देसाईवाडा आणि ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सरचिटणीस …

Read More »

पावसापूर्वीच तालुक्यातील सर्व विद्युत दुरुस्ती कामे पूर्ण करा; यात्रा काळात वीज सुरळीत द्या

  खानापूर : ऐन पावसाळ्यात बऱ्याच वेळा वीज दुरुस्ती कामासाठी काढली जाते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी विद्युत ताराना लागणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि इतर अडचणी च्या ठिकाणचे पार्ट बदलने ही सर्व कामे आताच आवरून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यात लोकांना अंधारात राहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही तसेच गर्लगुंजी …

Read More »

येडियूरप्पा अभिमानोत्सवाची भव्य तयारी

  २६ एप्रिलला भूमिपूजन, ९ मे रोजी चित्रदुर्ग येथे मुख्य कार्यक्रम बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या अभिमानोत्सव कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी रविवारी (ता. २६) सकाळी १० वाजता भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार गोविंद …

Read More »

राज्यात अनुसूचित जाती अंतर्गत उपविभागीय आरक्षण

  मंत्रिमंडळाचा निर्णय; ए, बी, सी प्रवर्गांना नव्या प्रमाणात वाटप बंगळूर : राज्यातील दलित समाजाच्या दीर्घकालीन मागणीसंदर्भात अनुसूचित जाती (एससी) अंतर्गत उपआरक्षणाबाबत मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, डाव्या आणि उजव्या गटांना प्रत्येकी ५.२५ टक्के आरक्षण देण्यात येणार असून इतर गटांना …

Read More »

वादळी वाऱ्यामुळे माणकापूर शाळेचे नुकसान; सहकाररत्न उत्तम पाटील यांनी केली पाहणी

  निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरात गुरुवारी (ता.२३) वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना तडे जाण्यासह छप्पर उडून गेली आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय माणकापूर येथे वादळी वाऱ्यामुळे प्राथमिक शाळेचेही नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी शुक्रवारी (ता.२४) …

Read More »

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात निपाणीचा झेंडा; निपाणी तालुक्याचा ९५.८८ टक्के निकाल

  निपाणी (वार्ता) : दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी (ता.२३) जाहीर झाला आहे. त्यामध्ये निपाणी तालुक्याने चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये केएलई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी नम्रता भारत माने व श्रावणी परशुराम पाटील या दोघींनी ९९.२% गुण मिळवत तालुक्यात पहिला …

Read More »