Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी खानापूर-जांबोटी मार्ग आजपासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  बेळगाव : खानापूर-जांबोटी रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गुरुवार, दि. ३० एप्रिल ते ५ मे पर्यंत असे सहा दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या काळात खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसळी, जांबोटी रोडवरून वळविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. …

Read More »

बंगळुरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू

  बंगळूर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाड्यानंतर दिलासा देणारा पाऊस उलट नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर विस्कळीत झाले असून, जोरदार वाऱ्यासह पडलेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजीनगर येथील बौरींग रुग्णालयाजवळील कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये …

Read More »

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला प्राधान्य द्यावे; अरुण निकाडे

  कुर्ली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सन्मान निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा आभाव असतो पण त्यावर मात करीत करिअर निवडतांना स्पर्धा परीक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे मत स्कूल बेटरमेंट कमिट अध्यक्ष अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष …

Read More »

सिद्धरामय्या पुढे राहण्यास किंवा राजीनाम्यासही तयार

  के. एन. राजण्णा; सत्तेबाबतचा निर्णय हायकमांडवर बंगळूर : सिध्दरामय्या हे मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यास तसेच आवश्यक असल्यास राजीनामा देण्यासही तयार आहेत, अशी माहिती माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना राजण्णा म्हणाले की, पक्षातील नेतृत्वावरील गोंधळ हायकमांडने लवकरात लवकर सोडवला पाहिजे. हा गोंधळ जितका वाढेल तितके पक्षाचे नुकसान …

Read More »

सरकारी शाळांच्या बळकटीसाठी मुख्यमंत्र्यांची आठ ‘हमी’ घोषणा

  बंगळूर : राज्यातील सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आठ महत्त्वाच्या ‘हमी’ योजना जाहीर केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने ही व्यापक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांची कमतरता तातडीच्या भरतीद्वारे दूर करण्यात येणार आहे. प्रत्येक …

Read More »

करामधील सूट मिळण्यासाठी निपाणी नगरपालिकेत कर भरण्यासाठी गर्दी

  निपाणी (वार्ता) : नवीन आर्थिक वर्षाला एक एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेध्ये मालमत्ता कर (घरफाळा) पाणी पट्टी ३० एप्रिल पर्यंत करा मध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय थकबाकी वसुलीची मोहीम राबवली जात आहे. मालमत्ता कर वेळेत …

Read More »

दहावीमध्ये राज्यात दुसरा आलेल्या झुंजवाड येथील दिव्या देसाईचा शिवस्वराज संघटनेतर्फे सत्कार

  खानापूर : राज्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणे ही खानापूर तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असून दिव्या देसाई हिने पुढील शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करावी असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तसेच शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले आहे. दहावी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेल्या …

Read More »

बोरगावमध्ये विद्युत खांब वाहिन्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

  वादळी वाऱ्यामुळे वीज खांबांचे मोठे नुकसान; ५० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण निपाणी (वार्ता) : चार दिवसांपूर्वी बोरगाव परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे बोरगावसह परिसरातील वाडी-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून जमीनदोस्त झाल्या असून विज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अंधारात …

Read More »

मॉन्सूनपूर्व खरीपाच्या कामांना वेग

  मृग नक्षत्र ४० दिवसांवर; अक्षय तृतीया पासून लगबग निपाणी (वार्ता) : अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयापासून प्रत्यक्ष खरिपाच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मृग नक्षत्र ४० दिवसांवर येऊन ठेपले आहे. ग्रामीण भागात शेतकरी पारंपारिक पद्धतीने बैल जोड्या सह ट्रॅक्टर द्वारे मशागतीची कामे सुरू केली आहेत. …

Read More »

उन्हाच्या चटक्यात शेकडो प्रवासी बस स्थानकावर

  सुट्या, लग्नसराईमुळे प्रवाशांची गर्दी निपाणी (वार्ता) : उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईमुळे येथील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. रविवारी (ता. २६) तापमान ४३ अंशांवर गेले असताना अक्षरशः चटके सोसत प्रवासी आपल्या बसची प्रतीक्षा करताना दिसून आले. त्यामध्ये विशेषतः महिला वृद्ध नागरिकांनी लहान मुलांना त्रास होत आहे. रविवारी उन्हाने विक्रम करीत …

Read More »