संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पार्श्वलब्दी ग्रुप, श्रावकगण आणि बेळगांव पार्श्वलब्दी सेवा ट्रस्टच्या वतीने वर्धमान महावीर जयंती आणि परमपूज्य कर्नाटक केसरी आचार्य श्री भद्रंकरसूरीश्वरजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर समुदाय भवनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धमान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादसेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. …
Read More »ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा राजीनामा देणार!
संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अडचणीत बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ते उद्या (ता. 15) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील. बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभुत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने …
Read More »खानापूर हेस्काॅम कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी झाली. हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी बोलताना हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. म्हणाले की, …
Read More »खानापूरच्या वनविभागाकडून तब्बल दोन महिन्याने व्याघ्र गणना!
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर वनविभागाने व्याघ्र गणना दि. 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली. मात्र खानापूर वनविभागाचे एसीएफ संतोष चव्हाण यांनी तब्बल दोन महिन्यानंतर माहिती दिली. व्याघ्र गणनेच्या निमित्ताने जंगलातील एकूण प्राण्यांची संख्याही मोजण्यात आली. त्यामुळे खानापूरच्या वनवैभवात भर पडून संख्या समजण्यास मदत झाली. खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात …
Read More »कंत्राटदार संघटनेचे 25 मेपासून काम बंद आंदोलन
संघटनेचे अध्यक्ष केंपाण्णा, भ्रष्टाचाराची कागदपत्रे जाहीर करण्याचा इशारा बंगळूर : कर्नाटक स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन (केसीएससीए)ने बुधवारी जाहीर केले, की त्यांचे सर्व सदस्य विविध सरकारी विभागांमधील बेकायदेशीर भ्रष्टाचारच्या निषेधार्थ 25 मे पासून एक महिना नागरी कामे बंद ठेवतील. असोसिएशनने सरकारमधील ’40 टक्के किकबॅक’ घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली …
Read More »संकेश्वर बाजारात निळे फेटे, टोप्यांचे आकर्षण….
संकेश्वर (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संकेश्वर बाजारात निळे ध्वज, फेटे-टोप्या बॅच (बिल्ले) यांना मोठी मागणी दिसली. येथील पुष्पंम सेंटर दुकानात निळे बॅच (बिल्ले) हातोहात विक्री झाले. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पुष्पंम सेंटरचे मालक पुष्पराज माने म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण दुकानात निळे …
Read More »संकेश्वरात शनिवारी श्री हनुमान मंदिर उद्घाटन सोहळा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड यशागोळ काॅलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा हनुमान जयंती दिनी शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी होत असल्याची माहिती चंद्रशेखर यशागोळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते म्हणाले यशागोळ काॅलनीत उभारण्यात आलेल्या पवनपुत्र मंदिराचे उद्घाटन हनुमान जयंतीला …
Read More »गोकाकच जिल्हा होणार : रमेश जारकीहोळी
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्याचा विस्तार वाढला आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगांवचा उल्लेख केला जातो. बेळगांव जिल्हा विभाजनात प्रामुख्याने गोकाकचा नामोल्लेख केला जात असल्याने गोकाकच जिल्हा होणार यात तिळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते संकेश्वरला धावती भेट देऊन शिवकृपा कार्यालयात पत्रकारांशी …
Read More »जत्राटमध्ये १७ रोजी सामाजिक संघर्ष परिषद
भरत कांबळे यांची माहिती : रामदास आठवले यांची उपस्थिती निपाणी (वार्ता): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१७) सकाळी दहा वाजता जत्राट येथे सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भरत कांबळे यांनी दिली. बुधवारी (ता.१३) …
Read More »गृहमंत्री ज्ञानेंद्र, भाजप मुख्य सचिव सी. टी. रवी यांच्यावर गुन्हे दाखल करा
काँग्रेसतर्फे मागणी : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : बंगळूर येथे घडलेल्या घटनेवरून खरी माहिती न घेताच राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र व भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजामधील शांतता भंग पावली आहे. शिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोघांचे वक्तव्य निंदनीय असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta