Monday , April 20 2026
Breaking News

ग्रामीण भागातील जनतेशी चर्चा करून समस्या निवारण करू : डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love


खानापूर : खानापूर तालुक्यातील करीकट्टी, कक्केरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्योती कार्यक्रमाचा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दीपप्रज्वलनाने शुभारंभ केला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी गावातील लोकांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिले.
मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी नियती फाउंडेशनवतीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला केएमएफचे संचालक बेळगाव श्री. प्रकाश यु. अंबोजी, दयानंद चोपडे, बसवराज कडेमानी, ईश्वर सानिकोप्प, नागेश रामाजी, मंजुनाथा अंबोजी, बाबू देगावी, जत्रा समितीचे सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

Spread the love  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *