नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध …
Read More »वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलन; 31 जणांचा बळी
जम्मू : जम्मूतील कटरा येथील वैष्णोदेवी धाम येथील अर्धकुमारी मंदिराजवळ काल (26 ऑगस्ट) मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता वैष्णोदेवीच्या जुन्या मार्गावरील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दुर्घटना घडली. काल रात्री उशिरापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, परंतु सकाळी हा आकडा वाढला. प्रशासनाचे …
Read More »सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका, बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेत आधार ग्राह्य धरावाच लागेल
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झटका दिला आहे. बिहारमध्ये सुरु असलेल्या मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) संदर्भात न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निवेदन केले आहे. आयोगाला आधार कार्ड स्वीकारावे लागेल. मतदार यादीसाठी सुरु असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांद्वारे दिले जाणारी ११ कागदपत्रे किंवा आधारकार्ड स्वीकारावे लागले. …
Read More »30 दिवसांची तुरुंगवारी; मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची जाणार
नवी दिल्ली : देशभर विरोधकांनी व्होट चोरीच्या मुद्द्यावरुन रान उठवले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना थेट घरी बसवण्यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक मांडले आणि विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला.. अमित शाहांनी लोकसभेत मांडलेल्या 130 व्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जेलवारी झाल्यास त्यांची हकालपट्टी निश्चित करण्यात …
Read More »दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. …
Read More »माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सीपी राधाकृष्णन यांचे आव्हान …
Read More »ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. येत्या २२ ऑगस्टला त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरा होणार होता, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोतदार यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली. त्यांंच्या पार्थिवावर …
Read More »सी. पी. राधाकृष्णन एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली : एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या …
Read More »देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू
राजनांदगाव : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालक गंभीर जखमी आहे. इंदूरमधील सहा मित्र उज्जेनला भेट देऊन ओडिशाच्या दिशेने जात होते. परंतु, चिरचरी राष्ट्रीय महामार्ग क्राँसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे …
Read More »दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील हुमायू येथील मकबऱ्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. दर्गा शरीफ फत्ते शाहच्या आतील खोलीतील भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta