Sunday , July 26 2026
Breaking News

राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे योगदान महत्वाचे : डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love

 

कुसमळी-खानापूर येथे हळदीकुंकू कार्यक्रम

खानापूर : कुसमळी-खानापूर येथील जीर्णोद्धारित महालक्ष्मी मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बेळगाव दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील, भाजप राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, पंडित ओगले, ग्रामपंचायत अध्याक्ष सौ. आरोही पाटील, मेघा कदम, अनंत सावंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार अभय पाटील यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणाने गर्दीला प्रेरित केले. स्वप्न पाहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि जीवनात महिलांचे महत्त्व काय आहे, असे ते म्हणाले.

डॉ. सोनाली सरनोबत यांनी राष्ट्र उभारणी आणि सामाजिक विकासासाठी महिलांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल भाष्य केले. त्या म्हणाल्या की, समाज सर्व पैलूंमध्ये परिवर्तन आणि पुनरुज्जीवनातून जात आहे. आपण योग्य पैलू धरला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत, जे घरातील स्त्री साध्य करू शकते.

या प्रसंगी सर्वांनी आपले विचार मांडले. पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि देवतांची पूजा करून झाली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *