Friday , April 17 2026
Breaking News

प्रति टन ४००० हजार रुपये दर घोषित केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका

Spread the love

 

रयत संघटनेचे हारूगेरी क्रॉसवर यल्गार आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने निश्चित केलेली यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी किंमत ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करणारी आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास सहमत नाहीत. या एफआरपीशिवाय किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४००० रुपये प्रति टन या दराने देण्यात यावा. त्यनंततरच कारखाने सुरू करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.१०) हारुगेरी क्रॉस वर संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
यावेळी शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर पद्धतीने सरकारच्या एपीएमसी तर्फे जिल्ह्यातील प्रमुख मंडळांमध्ये डिजिटल वेब ब्रिज बसवावेत. ठिकठिकाणी तातडीने वजन पूल बसवावेत. ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ५० किलोमीटर आणि ४० किलोमीटरचा वाहतूक खर्च आकारून होणारे फसवणूक थांबवावी. सर्वत्र पुरेसा ऊस आहे. वाहतूक खर्च सारखाच आहे. तिथे शेतकऱ्यांना ३०० रुपयेक् मिळणारा नफा वाचवूनन शेतकऱ्यांचे रक्षण करावे. ऊस तोडणाऱ्या कामगारांना लेबरकार्ड देऊन त्यांचे संरक्षण करावे.
बेळगाव जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त आणि साखर मंत्र्यांना कारखाना मालक आणि शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेऊन किंमत निश्चित करूनच कारखाने सुरू करावेत. कारखाना आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल तर हे शक्य नाही. शेतकरी ऊस पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. पण त्याच्या तुलनेत ऊसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत. त्यांना रोखण्यासाठी साखर कारखान्यांनी उसाला योग्य दर दिला पाहिजे अशा मागण्या यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे करण्यात आल्या.
हारुगेरी क्रॉस येथील एपीएमसी मार्फत डिजिटल न झालेल्या पुलाला जोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना योजनांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी नियोजन स्वीकारून येत्या चार दिवसात सर्व कारखानदारांच्या कार्यकारी संचालक आणि रयत संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत. याशिवाय आपल्या कार्यक्षेत्रात वजन काटे बसवण्याची सूचना करण्याच्या आश्वासन दिले
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, राज्य मानधन अध्यक्ष शशिकांत गुरुजी, रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवर, बाबूगौडा बाबिले, चुनाप्पा पुजारी, कुमार मरडी, गोपाळ कुकनूर, सत्याप्पा मल्लापुरी, मल्लप्पा दुकान, मंजू पुजारी रमेश कोल्लूर, मुबारक तांबोळी, निंगाप्पा पाकंडी, बाबासाहेब पाटील, कलगोंडा कोटगे, विजय मंगावते, सर्जेराव हेगडे
यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *