Friday , December 12 2025
Breaking News

पाचवी, आठवीची परीक्षा घेण्यास न्यायालयाचा ग्रीन सिग्नल

Spread the love

 

२७ मार्चपासून बोर्डाची परीक्षा; सर्वच विद्यार्थी होणार उत्तीर्ण

बंगळूर : उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. पाचवी आणि आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान देत विभागीय खंडपीठात अपील दाखल केले होते.
१० दिवसांनंतर म्हणजेच २७ मार्चपासून परीक्षा घेण्याची उच्च न्यायालयाने सूचना केली आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणताही प्रश्न विचारता येणार नाही, परीक्षेचा निकाल सार्वजनिकरित्या जाहीर करता येणार नाही, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परीक्षेचा निकाल फक्त शाळेतच पाठवावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.
इयत्ता पाचवी व आठवीची परीक्षा घेण्यास शिक्षण कायद्यांतर्गत कोणतेही बंधन नाही, म्हणून विभागीय खंडपीठाने एकल सदस्यीय खंडपीठाचा आदेश रद्द करून परीक्षा घेण्याचा आदेश दिला.
उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्यानंतर पुढील सुनावणी आज (ता.१५) दुपारी चार वाजता सुरू झाली.
राज्य अभ्यासक्रमाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात सुनावणी झाली. न्यायमुर्ती नरेंद्र आणि न्यायमुर्ती अशोक किनगी यांच्या न्यायपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

सर्व विद्यार्थी होणार उत्तिर्ण
उच्च न्यायालयाने राज्यभरातील दोन्ही वर्गांसाठी बोर्ड परीक्षांना परवानगी दिली. मात्र, यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना आनंद देणारी एक कल्पनाही आहे. ही परीक्षा २७ मार्चपासून घेण्यात यावी. परीक्षेचे वेळापत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, परीक्षेला बसलेल्या एकाही विद्यार्थ्याला नापास करू नये, असे निर्देशही शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
सरकारने प्राथमिक आणि वरिष्ठ प्राथमिक स्तरावरील इयत्ता पाचवी आणि आठवी साठी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, अशी माहिती देण्यात आली. न्यायालयात सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकीलानीही विद्यार्थ्यांना नापास करणार नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय, एसएसएलसी आणि बारावीची पीक्षा घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षेपूर्वी दोन टप्प्यांत बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव देऊन विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या तयार केले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची भीती न बाळगता सराव आणि परीक्षेचे लेखन करण्यास मदत होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *