Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने नागरिक संतप्त

बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असतो. यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदाशिवनगरच्या शेवटच्या क्रॉसवर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची नादुरुस्ती कायमची डोकेदुखी बनली आहे. पावसाळ्यात देखील या भागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीतरीत्या मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी लागली उतरणीला, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला

  कोल्हापूर : गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 24 तासांपासून जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड …

Read More »

पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक

  सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवले सिंगापूर : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणार्‍या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने 32 मिनिट सुरु …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतरावर निर्णय, औरंगाबाद आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर

  मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ’29 तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन …

Read More »

ईदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा …

Read More »

राष्ट्रध्वज पॉलिस्टरचा बनविण्याच्या निर्णयास विरोध करण्याची गरज

  बेळगाव : तिरंगा ध्वज हा केवळ काठी व कापडाचा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. लाखो भारतीयांच्या त्यागातून त्याची निर्मिती झाली असून तो देशाची शान व अभिमान आहे. यासाठी तो पॉलिस्टरचा बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनतेने विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन गांधीवादी अशोकभाई देशपांडे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी …

Read More »

गर्लगुंजीत मराठी मुलांच्या कोसळलेल्या शाळा इमारतीची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ८५ वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ही बातमी कळताच बेळगाव जिल्हा न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, बीईओ लक्षणराव यकुंडी, खानापूर तालुका न्यायाधीश सूर्यनारायण, खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, …

Read More »

अंशतः विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा संततधार

  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल शुक्रवारी काही अंशी विश्रांती घेतली. बऱ्याच दिवसानंतर बेळगाव परिसरातील नागरिकांना सूर्यदर्शनही घडले. मात्र त्यानंतर सायंकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्रीही दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. आज शनिवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा संततधार पावसाने सुरुवात केली आहे. प्रशासनाने पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ …

Read More »

प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव …

Read More »

विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीही स्पर्धेत

मुंबई  : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »