Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

दहा रुपयांच्या नाण्याबाबत जनजागृती करा

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून 2016 साली घोषित केले. मात्र याचा वापर बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्यापही केला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे कोठेच चलनात नसल्याचे निदर्शनास …

Read More »

त्या घटनेविरोधात कुद्रेमनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे!

बेळगाव (वार्ता) : कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांना अवमानकारकरित्या अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. एका महिलेने अर्वाच्च शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले …

Read More »

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर आंदोलन छेडणार : प्रमोद मुतालिक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी दिला आहे. त्यांनी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला धावती भेट देऊन देवदर्शन घेऊन श्री शंकराचार्य महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. तद्नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रमोदजी मुतालिक म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपाचे …

Read More »

पिग्मी कलेक्टरचा मुलगा बनला पोलीस!

परिसरातून कौतुक : जिद्दीच्या जोरावर मिळवले यश निपाणी (विनायक पाटील) : विज्ञान विभागात उच्चशिक्षित होऊन ही पोलिस बनण्याचे स्वप्न असल्याने गेल्या दोन वर्षापासून जिद्द, चिकाटी, व कष्टाने अभ्यास करीत परिश्रम घेतल्याने कितनी कलेक्टरचा मुलगा पोलीस बनला आहे. बोरगाव येथील युवक शुभम बाहुबली रोड्ड यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांची …

Read More »

समाजातील अत्याचार संपवण्यासाठी संघर्षाची गरज

मीनाक्षी पाटील : वीतराग महिला मंडळातर्फे हळदीकुंकू निपाणी (वार्ता) : मोबाईल व पाश्त्यात संस्कृतीमुळे देशाची अवस्था पुन्हा आधारलेली असून स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशा अत्याचार संपविण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा मोठा संघर्ष करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …

Read More »

तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा द्या

मंगलमुखी समुदायाकडून तहसीलदारांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश निपाणी (वार्ता) : तृतीयपंथी लोकांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांना जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने अशा कुटुंबियांसाठी शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन येथील मंगलमूर्ती संघटनेतर्फे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, आधार कार्ड, …

Read More »

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेला कोरोना नियम बंधनकारक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आज सायंकाळी मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यान्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सभा घेऊन श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा शासकीय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपतहसीलदार के. के. बेळवी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक …

Read More »

निपाणीत दुचाकी चोरट्यासह मुद्देमाल जप्त

निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. अखेर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामध्ये बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. त्यामध्ये आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत. इतर सोन्या-चांदीच्या वस्तूसह 3 लाख 46 हजार 688 रुपयाचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली …

Read More »

स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

उचगाव : गुरु शिष्याचे नाते हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्रगत तंत्रज्ञानात गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी केलेला हा सोहळा पाहून आम्ही धन्य झालो. शिष्यांच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु शिष्य नाते हेच सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 130 या …

Read More »

म. ए. समितीच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्‍यांसमवेत विविध विषयांवर चर्चा

बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज दुपारी बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्नाबाबत चर्चा केली. कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिक अल्प संख्याकांचे संदर्भात केरळ सरकारने अल्पसंख्यांक आयोगाला दिलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. …

Read More »