Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

नेसरीत 19 वे जटानिर्मूलन; नेसरी व गडहिंग्लज शाखा अंनिसचा पुढाकार

  नेसरी : येथे महाराष्ट्र अनिस नेसरी व गडहिंग्लज शाखेच्या पुढाकाराने आणि नेसरी वाचन मंदिर व पत्रकार संघाच्यावतीने येथील विवाहित महिला प्रियांका समीर सुतार, (वय 30) यांच्या डोक्यावरील जटा काढण्यात आल्या. अनिसचे राज्याचे सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, पांडुरंग करंबळकर गुरुजी, अशोक मोहिते आदिनी कात्री चालवून प्रियांका यांच्या …

Read More »

लिंगायत पंचमसाली आंदोलनकर्त्यांवर लाठीमार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

  बसवजय मृत्युंजय स्वामीजी बेळगाव : लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचा निषेध करत श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे अनिश्चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ आणि लिंगायत समाजाचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागावी, या मागणीसाठी श्री …

Read More »

ख्रिसमसचा संयुक्तिक कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात

  बेळगाव : बेळगाव शहरात नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू असताना येथील मेथोडिस्ट चर्चच्या आवारात कमिशन फॉर इक्यूमेनिझम आणि सेंट्रल मेथोडिस्ट चर्च, बेळगाव यांच्या सहकार्याने ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्सद्वारे आयोजीत संयुक्तिक ख्रिसमस कार्यक्रम शहरातील विविध चर्चच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिकतेने उत्साहात पार …

Read More »

बेळगावात विविध मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन

  बेळगाव : विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, शिष्यवृत्तीच्या वितरणात होणारा भेदभाव थांबवावा आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिक बस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांसाठी आज बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) वतीने आंदोलन करण्यात आले. आज बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या …

Read More »

कचरावाहू वाहन पडले कालव्यात; चालकाला जलसमाधी

  बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कचरा टाकणारे वाहन कालव्यात पडले व चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहराच्या हद्दीत पालिकेच्या कचरावाहू वाहनाचे नियंत्रण सुटून मलप्रभा नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाळेकुंदर्गी कालव्यात पडून अपघात झाला. या अपघातात कचरावाहू वाहनाचा चालक 48 वर्षीय गदिगेप्पा कामन्नवर याचा जागीच मृत्यू …

Read More »

बाळंतीण व नवजात शिशुंच्या मृत्यूंबद्दल काँग्रेस सरकारवर भाजपचा हल्लाबोल

  बेळगाव : बाळंतीण व नवजात शिशुंच्या मृत्यूंबद्दल भाजप महिला मोर्चाने भव्य आंदोलन छेडून राज्य सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्नाटक राज्यातील बाळंतीण व नवजात शिशुंच्या मृत्यूंबद्दल भाजप महिला मोर्चाने काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र …

Read More »

येळ्ळूर येथे राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा 22 डिसेंबरला

  येळ्ळूर : 865 सीमावासीय शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या नियोजनाची बैठक येळ्ळूर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता उघाडे यांनी केले. 865 सीमावासीय गावातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची परिस्थिती बघता त्यांना योग्य …

Read More »

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म. ए. समितीचे कार्यकर्ते नागपूरकडे रवाना

  बेळगाव : एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे. महायुतीच्या सरकारकडून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर …

Read More »

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह तीन जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. प्रयागराज न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या केसमध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निकिता आणि अतुल यांच्याबाबत जौनपूर …

Read More »

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा : मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने पत्राद्वारे मागणी

    बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करू नये. या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील निर्णय घेण्यासाठी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक बोलवावी, असे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पाठविण्यात आले आहे. …

Read More »