Monday , March 17 2025
Breaking News

येळ्ळूर महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी सुनावणी उद्या

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवून मराठी जनतेवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी लोकांनीच हल्ला केल्याचा कांगावा केला. लोकांवर गुन्हे दाखल केले. या याचिकेवर आता बुधवारी(दि. ८) होणार आहे. २०१४ मध्ये पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आला. शांतता पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांवर अनामुष हल्ला करण्यात आला. त्यानंतर लोकांवरच गुन्हे नोंदवण्यात आले. २०१५ पासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकूण ७७ जणांवर दोषारोप आहे. पण, साक्षीदार
आणि संशयित वारंवार गैरहजर राहात असल्यामुळे याचिका लांबणीवर पडत आहे. याआधी साक्षीदारांना समन्स बजावण्यात आला असला तरी, न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सुनावणीला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन वकिलांकडून करण्यात आले
आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी व जंगमट्टीच्या धरणाचे पाणी मार्कंडेय नदीमध्ये वळविण्यासंदर्भात आम. शिवाजी पाटील यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र सीमेवरील तिलारी धरणाचे जे कोंकणात वाहून जात असलेले व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *