बेळगाव : शरिरातील रक्तात महत्वपूर्ण घटक असतात जे आपल्या प्रकृतीकरिता आवश्यक असतात. त्यांची संख्या कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजरी पडतो. म्हणून नियमित रक्तदान करणे आवश्यक असते. रक्तदान करत राहल्याने आपल्या शरीरात नविन रक्त निर्माण होत राहते. शिवाय आपण रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींची गरज देखील भागते त्यामुळे रक्तदान करणे गरजेचे असल्याचे मत इव्हेंट चेअरमन मदन बामणे यांनी व्यक्त केले.
पद्मश्री कै. नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त केएलई हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन विशेष समिती सदस्य मोहन कारेकर यांच्याहस्ते नाना चुडासमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी केएलई रक्तपेढीच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
मदन बामणे, मदन सरदेसाई, अरुण काळे, धनलक्ष्मी, भास्कर कदम, अविनाश पाटील, पुंडलिक पावशे, जीवन कदम, काशिनाथ कदम, अभय जाधव, प्रसाद कदम, अशोक हलगेकर, रमेश हदीमनीरे, बाळाप्पा तवलगेडी, महादेव केसरकर यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात रमेश हादीमनीरे या अंध युवकाने रक्तदान केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी केएलई रक्तपेढीचे प्रमुख एस.बी. विरगी, डॉ. विठ्ठल माने, डॉ. आनंद बी., बसवराज देवगी यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी जायंट्स मेनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.