Friday , November 7 2025
Breaking News

आंदोलन करून परतत असताना झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

Spread the love

 

कित्तूर तालुक्यातील घटना

बेळगाव : गावात बसची व्यवस्था करावी या मागणीसाठी आंदोलन करून घरी जात असताना झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या. आठवीच्या वर्गात अक्षता हुलीकट्टी (१४) हि शिकत होती.
कित्तूर तालुक्यातील निच्छनीके गावाजवळ हा अपघात घडला.
गावात बस वेळेवर येत नसल्याने आज आंदोलन करण्यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर घराकडे पायी जात असताना तीन विद्यार्थिनींना कारने धडक दिली. यातच अक्षता हिचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने साखरमंत्र्यांची बेळगावात एंट्री!

Spread the love  बेळगाव : ऊस दराच्या वाढत्या तणावामुळे राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी आज, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *